शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

राज्यातील कारखान्यांना ऊसासाठी करावी लागणार धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 13:24 IST

दसरा व दिवाळीच्या आसपास साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असतात. परंतु अनेक साखर कारखाने या वर्षी बंद राहणार आहेत.

ठळक मुद्देदुष्काळाचा, पुराचा परिणाम : हंगामाचा ऊस नेला गुऱ्हाळ अन् रसवंतीगृहांनी

रांजणगाव सांडस :  भीमा व मुळा-मुठा नदीच्या काठावरील गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला. यात पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला. शेतकऱ्यांनी पाण्याअभावी ऊस गुऱ्हाळे यांना ३००० ते ३५०० बाजार भाव प्रतिटनप्रमाणे दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उसाचे हक्काचे चार पैसे मिळाले असले तरी कारखान्यांकडून मिळणारे एकरी टनेज न मिळाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. सध्या उसाचे प्रमाण कमी असल्याने कारखान्यांना मात्र ऊस मिळवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. दसरा व दिवाळीच्या आसपास अनेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असतात. परंतु अनेक साखर कारखाने या वर्षी बंद राहणार आहेत. कारण हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्याला ऊस कमी पडणार आहे. याला कारण आहे, दुष्काळजन्य परिस्थिती व रसवंतीगृह व गूळ बनविणारे गुऱ्हाळ.. त्यांनी साखर कारखान्यांपेक्षा जास्त व एकरकमी बाजारभाव दिल्यामुळे साखर कारखाने सुरू होतील तोपर्यंत ऊस ठेवला नाही. कारण कारखान्यांचा बाजार हप्त्यामध्ये  अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस रसवंतीगृहाला दिलेला आहे. त्यामुळे अनेक  शेतामध्ये उसाचे टिपरूही शिल्लक राहिलेले नाही.   सहकारी साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने  ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांचा ऊस हे कारखान्याच्या क्षेत्राबाहेरील अनेक कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गळीत हंगामासाठी नेत होते. त्यामुळे  साखर कारखानदारी अडचणीत नव्हती. जिल्ह्यातील साखर कारखाने बाजारभाव देण्यासाठी नेहमी स्पर्धा करत असे, परंतु अलीकडील काळामध्ये कमी झालेले पर्जन्यमान, खासगी साखर कारखानदारी तसेच मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळ मालक आणि परराज्यांतील रसवंतीगृहांकडून उसाची वाढलेली मागणी, यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला मोठी मागणी आहे. यामुळे गाळपासाठी आवश्यक असलेला ऊस पळवण्यात येऊ लागल्यामुळे कारखान्यांनाच ऊस कमी पडायला लागला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती व कारखान्यांचे बाजारभाव कमी-जास्त प्रमाणात देण्यामागचे हे कारण आहे. आजही शेतकऱ्यांना पाण्याची समस्या सोडवता आलेली नाही. चासकमानचे आवर्तन शिरूर तालुक्यात सुटल्यानंतर शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेततलाव हे धरणातील सुटलेल्या पाण्याच्या विसर्गातून  भरले गेले असते तर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न मिटला असता. परंतु धरणातील अतिरिक्त पाणी हे नद्यांमध्ये सोडल्यामुळे पाणी आले. नदीला पूर आला, पूर वाहून गेला, परंतु शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाहण्यासाठी पाणी शिल्लक राहिलेले आहे.  ...........चासकमान धरणाच्या पाण्याचे व घोड धरणाच्या पाण्याचे योग्य वाटपाचे  नियोजन न झाल्यामुळे शिरूर तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर शेतकऱ्यांनी आपला कमी वयाचा ऊस गुऱ्हाळे, रसवंतीगृहांना दिला नसता .- अशोक पवार, माजी आमदार .............सहकारी साखर कारखानदारी वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने साखरेला हमी भाव द्यावा. शेतकरीवर्गाला यातून हक्काचे चार पैसे मिळतील. - सुधीर फराटे पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष व संचालक,  घोडगंगा साखर कारखाना ............

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती