शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

राज्यातील कारखान्यांना ऊसासाठी करावी लागणार धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 13:24 IST

दसरा व दिवाळीच्या आसपास साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असतात. परंतु अनेक साखर कारखाने या वर्षी बंद राहणार आहेत.

ठळक मुद्देदुष्काळाचा, पुराचा परिणाम : हंगामाचा ऊस नेला गुऱ्हाळ अन् रसवंतीगृहांनी

रांजणगाव सांडस :  भीमा व मुळा-मुठा नदीच्या काठावरील गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला. यात पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला. शेतकऱ्यांनी पाण्याअभावी ऊस गुऱ्हाळे यांना ३००० ते ३५०० बाजार भाव प्रतिटनप्रमाणे दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उसाचे हक्काचे चार पैसे मिळाले असले तरी कारखान्यांकडून मिळणारे एकरी टनेज न मिळाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. सध्या उसाचे प्रमाण कमी असल्याने कारखान्यांना मात्र ऊस मिळवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. दसरा व दिवाळीच्या आसपास अनेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असतात. परंतु अनेक साखर कारखाने या वर्षी बंद राहणार आहेत. कारण हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्याला ऊस कमी पडणार आहे. याला कारण आहे, दुष्काळजन्य परिस्थिती व रसवंतीगृह व गूळ बनविणारे गुऱ्हाळ.. त्यांनी साखर कारखान्यांपेक्षा जास्त व एकरकमी बाजारभाव दिल्यामुळे साखर कारखाने सुरू होतील तोपर्यंत ऊस ठेवला नाही. कारण कारखान्यांचा बाजार हप्त्यामध्ये  अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस रसवंतीगृहाला दिलेला आहे. त्यामुळे अनेक  शेतामध्ये उसाचे टिपरूही शिल्लक राहिलेले नाही.   सहकारी साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने  ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांचा ऊस हे कारखान्याच्या क्षेत्राबाहेरील अनेक कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गळीत हंगामासाठी नेत होते. त्यामुळे  साखर कारखानदारी अडचणीत नव्हती. जिल्ह्यातील साखर कारखाने बाजारभाव देण्यासाठी नेहमी स्पर्धा करत असे, परंतु अलीकडील काळामध्ये कमी झालेले पर्जन्यमान, खासगी साखर कारखानदारी तसेच मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळ मालक आणि परराज्यांतील रसवंतीगृहांकडून उसाची वाढलेली मागणी, यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला मोठी मागणी आहे. यामुळे गाळपासाठी आवश्यक असलेला ऊस पळवण्यात येऊ लागल्यामुळे कारखान्यांनाच ऊस कमी पडायला लागला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती व कारखान्यांचे बाजारभाव कमी-जास्त प्रमाणात देण्यामागचे हे कारण आहे. आजही शेतकऱ्यांना पाण्याची समस्या सोडवता आलेली नाही. चासकमानचे आवर्तन शिरूर तालुक्यात सुटल्यानंतर शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेततलाव हे धरणातील सुटलेल्या पाण्याच्या विसर्गातून  भरले गेले असते तर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न मिटला असता. परंतु धरणातील अतिरिक्त पाणी हे नद्यांमध्ये सोडल्यामुळे पाणी आले. नदीला पूर आला, पूर वाहून गेला, परंतु शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाहण्यासाठी पाणी शिल्लक राहिलेले आहे.  ...........चासकमान धरणाच्या पाण्याचे व घोड धरणाच्या पाण्याचे योग्य वाटपाचे  नियोजन न झाल्यामुळे शिरूर तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर शेतकऱ्यांनी आपला कमी वयाचा ऊस गुऱ्हाळे, रसवंतीगृहांना दिला नसता .- अशोक पवार, माजी आमदार .............सहकारी साखर कारखानदारी वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने साखरेला हमी भाव द्यावा. शेतकरीवर्गाला यातून हक्काचे चार पैसे मिळतील. - सुधीर फराटे पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष व संचालक,  घोडगंगा साखर कारखाना ............

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती