शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी राजकारणासाठी वापरल्याने कारखाने रसातळाला : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 11:18 IST

अडचणीत येतात तेव्हा शेतकऱ्यांना त्याग करायला सांगतात आणि चांगले दिवस आले की लुटतात.

ठळक मुद्दे‘सहकारी साखर कारखानदारीपुढील आव्हाने आणि उपाययोजना’विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे गरजेचे सगळी बंधने सहकाराला आणि खासगीला मोकळे रान हे बरोबर नाहीशेतकऱ्यांची चळवळ उभी राहिली पाहिजे

सोमेश्वरनगर : कारखाने बुडतात तेव्हा चालकाने दोन्ही खिसे भरून घेतलेले असतात. शेतकरी वाऱ्यावर सोडले जातात. प्यायला पाणी नाही, तिथे कार्यकर्ता सांभाळण्यासाठी कारखाने दिले गेले. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी राजकारणासाठी वापरल्याने कारखाने रसातळाला गेले असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. येथील मु. सा. काकडे महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य, गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ‘सहकारी साखर कारखानदारीपुढील आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावर आयोजित  दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सतीश काकडे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. महादेव वाळुंज, डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. देविदास वायदंडे, कल्याण भगत, नितीन कुलकर्णी, संजय घाडगे, विलास बोबडे, कैलास मगर, अविनाश जगताप, दत्तात्रेय भोईटे उपस्थित होते.  खासदार शेट्टी म्हणाले,  पंचवीस हजारांची सभा शक्य नसेल तर एक हजारामागे एक-दोन प्रतिनिधी घेऊन वरचेवर चर्चा करावी. अडचणीत येतात तेव्हा शेतकऱ्यांना त्याग करायला सांगतात आणि चांगले दिवस आले की लुटतात. एफआरपीचे तुकडे करण्यासाठी गुपचूप करार करतात. तेव्हा सरकार बघ्याची भूमिका घेतं. दुबळ्या लोकांकडून लिहून घेऊन एफआरपीचा कायदा मोडणारांना दरोडेखोर का म्हणू नये? व्हीएसआयमधील चर्चासत्रात चोºया उघड होतील म्हणून चळवळीतल्यांना बोलवत नाहीत, असा आरोप करत ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे गरजेचे आहे; अन्यथा भविष्यात ऊसतोडणीसाठी कामगार मिळणे मुश्किल होईल, असे शेट्टी म्हणाले.    सतीश काकडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, चंगळवादी वृत्ती मोडून काटकसरी बनले पाहिजे. सत्तेचा माज येऊ देता कामा नये. शेतकऱ्यांची पोरे सत्तेत जाऊन शेतकऱ्यांना विसरतात. ९७ व्या घटनादुरुस्तीत बदल हवा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सर्व कारखान्यांनी प्रतिटन निधी द्यावा. या वेळी संतोष शेंडकर यांचे भाषण झाले.माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, शंभर सहकारी साखर कारखाने उत्तम चालतात. त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. सगळी बंधने सहकाराला आणि खासगीला मोकळे रान हे बरोबर नाही. यासाठी १९६० च्या जुनाट सहकार कायद्यात काळानुरूप बदल झाले पाहिजेत. ...........शेतकऱ्यांची चळवळ उभी राहिली पाहिजेशेतकऱ्यांचीच मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे. चळवळच फक्त चोऱ्यांवर अंकुश बसवते. प्रशासन घाबरवते आणि सरकारवर दबाव ठेवू शकते. तेल, तेलबिया, डाळी आयात केल्याने रुपयाचे अवमूल्यन होत आहे. शेतकºयालाच खात्रीचे पैसे दिले तर ही आयात करावी लागणार नाही. तेल कंपन्यांचा इथेनॉलच्या धोरणात अडसर आहे. मधल्यांचे खिसे भरणारी धोरणे मोडून काढली पाहिजेत. अंकुश ठेवणारा तगडा नेता केंद्रात हवा.

टॅग्स :BaramatiबारामतीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारणFarmerशेतकरीGovernmentसरकार