शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी राजकारणासाठी वापरल्याने कारखाने रसातळाला : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 11:18 IST

अडचणीत येतात तेव्हा शेतकऱ्यांना त्याग करायला सांगतात आणि चांगले दिवस आले की लुटतात.

ठळक मुद्दे‘सहकारी साखर कारखानदारीपुढील आव्हाने आणि उपाययोजना’विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे गरजेचे सगळी बंधने सहकाराला आणि खासगीला मोकळे रान हे बरोबर नाहीशेतकऱ्यांची चळवळ उभी राहिली पाहिजे

सोमेश्वरनगर : कारखाने बुडतात तेव्हा चालकाने दोन्ही खिसे भरून घेतलेले असतात. शेतकरी वाऱ्यावर सोडले जातात. प्यायला पाणी नाही, तिथे कार्यकर्ता सांभाळण्यासाठी कारखाने दिले गेले. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी राजकारणासाठी वापरल्याने कारखाने रसातळाला गेले असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. येथील मु. सा. काकडे महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य, गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ‘सहकारी साखर कारखानदारीपुढील आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावर आयोजित  दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सतीश काकडे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. महादेव वाळुंज, डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. देविदास वायदंडे, कल्याण भगत, नितीन कुलकर्णी, संजय घाडगे, विलास बोबडे, कैलास मगर, अविनाश जगताप, दत्तात्रेय भोईटे उपस्थित होते.  खासदार शेट्टी म्हणाले,  पंचवीस हजारांची सभा शक्य नसेल तर एक हजारामागे एक-दोन प्रतिनिधी घेऊन वरचेवर चर्चा करावी. अडचणीत येतात तेव्हा शेतकऱ्यांना त्याग करायला सांगतात आणि चांगले दिवस आले की लुटतात. एफआरपीचे तुकडे करण्यासाठी गुपचूप करार करतात. तेव्हा सरकार बघ्याची भूमिका घेतं. दुबळ्या लोकांकडून लिहून घेऊन एफआरपीचा कायदा मोडणारांना दरोडेखोर का म्हणू नये? व्हीएसआयमधील चर्चासत्रात चोºया उघड होतील म्हणून चळवळीतल्यांना बोलवत नाहीत, असा आरोप करत ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे गरजेचे आहे; अन्यथा भविष्यात ऊसतोडणीसाठी कामगार मिळणे मुश्किल होईल, असे शेट्टी म्हणाले.    सतीश काकडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, चंगळवादी वृत्ती मोडून काटकसरी बनले पाहिजे. सत्तेचा माज येऊ देता कामा नये. शेतकऱ्यांची पोरे सत्तेत जाऊन शेतकऱ्यांना विसरतात. ९७ व्या घटनादुरुस्तीत बदल हवा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सर्व कारखान्यांनी प्रतिटन निधी द्यावा. या वेळी संतोष शेंडकर यांचे भाषण झाले.माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, शंभर सहकारी साखर कारखाने उत्तम चालतात. त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. सगळी बंधने सहकाराला आणि खासगीला मोकळे रान हे बरोबर नाही. यासाठी १९६० च्या जुनाट सहकार कायद्यात काळानुरूप बदल झाले पाहिजेत. ...........शेतकऱ्यांची चळवळ उभी राहिली पाहिजेशेतकऱ्यांचीच मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे. चळवळच फक्त चोऱ्यांवर अंकुश बसवते. प्रशासन घाबरवते आणि सरकारवर दबाव ठेवू शकते. तेल, तेलबिया, डाळी आयात केल्याने रुपयाचे अवमूल्यन होत आहे. शेतकºयालाच खात्रीचे पैसे दिले तर ही आयात करावी लागणार नाही. तेल कंपन्यांचा इथेनॉलच्या धोरणात अडसर आहे. मधल्यांचे खिसे भरणारी धोरणे मोडून काढली पाहिजेत. अंकुश ठेवणारा तगडा नेता केंद्रात हवा.

टॅग्स :BaramatiबारामतीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारणFarmerशेतकरीGovernmentसरकार