शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘मराठा आरक्षणासंबंधी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात नवीन आदेश काढू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 07:02 IST

मराठा आरक्षणासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्याबाबत काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या हरकती असल्याने, त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यास लवकरच नवा आदेश काढू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्याबाबत काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या हरकती असल्याने, त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यास लवकरच नवा आदेश काढू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली. नवीन आदेश काढेपर्यंत खुल्या प्रवर्गातील एकाही  कर्मचाºयाला सेवेतून काढणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. अक्षय शिंदे यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाला दिले.मराठा आरक्षणासंबंधी कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्यासंदर्भात सरकारने ११ जुलै रोजी काढलेल्या अधिसूचनेला काही सरकारी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याविरोधात निकाल दिला असतानाही, राज्य सरकारने ११ जुलै रोजी ही अधिसूचना काढली कशी? या उच्च न्यायालयाच्या प्रश्नावर सरकारी वकिलांनी राज्य सरकार या वादावर तोडगा काढण्यासाठी नवा आदेश पारित करणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली.हा वाद उच्च न्यायालयाच्या २०१५ व २०१९ मध्ये दिलेल्या वेगवगेळ्या आदेशांमुळे निर्माण झाला आहे. सरकारी नोकरी व शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला तत्कालीन मुख्य न्यायाधीश मोहीत शाह यांनी २०१५ मध्ये स्थगिती दिली.२७ जून रोजी उच्च न्यायालयाने मराठा समाजाला सरकारी नोकºयांत व शिक्षण क्षेत्रात आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्य ठरविला. राज्य सरकारने या निर्णयाच्या आधारावर ११ जुलै रोजी अधिसूचना काढून, मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू केले व सरकारी नोकºयांत तात्पुरत्या स्वरूपी भरण्यात आलेल्या खुल्या प्रवर्गातील कर्मचाºयांची सेवा निष्कासित करण्याचा आदेश दिला.या अधिसूचनेमुळे राज्यातील २,७०० खुल्या प्रवर्गातील कर्मचाºयांवर परिणाम होईल. मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा सरकारचा निर्णय बेकायदा आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCourtन्यायालय