शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Exclusive : नितेश राणे यांनी सांगितले 2014 मधील पराजयाचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 13:47 IST

भाजपची घोडदौड सुरु असताना सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समित्या ग्रामपंचायती राणेंनी ताब्यात ठेवल्या.

मुंबई : 2014 मध्ये आमच्याबाबत संभ्रम आणि चुकीची प्रतिमा निर्माण केली गेली, असे स्पष्टीकरण देताना त्यांनी राणे समर्थकांनी केलेल्या चुकांवरही गंभीर भाष्य केले. आमच्या सहकाऱ्यांनी केलेल्या चुका आमच्यावर लादल्या गेल्या. त्यांनी चुका केल्या त्याचा राग राणेंवर काढू, या भावनेतून 2014 मध्ये अपयश आले, अशी कबुली नितेश राणे यांनी दिली. 

स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची मुलाखत लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी घेतली. यावेळी नितेश राणे यांनी नारायण राणे यांची लोकसभेसाठीची भुमिका स्पष्ट केली. 

भाजपची घोडदौड सुरु असताना सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समित्या ग्रामपंचायती राणेंनी ताब्यात ठेवल्या. यामुळे लोकसभा, विधानसभेनंतर जनतेला कळून चुकले की राणेंशिवाय पर्याय नाही. राणे कोणताही निर्णय घेतात त्यावर चर्चा होते. ते जो निर्णय घेतात तो आमच्या हिताचा असतो, यामुळे मतभेद होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मतांचा आदर नेहमी करतो, असेही त्यांनी सांगितले. 

नारायण राणेंना सहकारी सोडून गेले, शंकर कांबळी, संदेश पारकर. यामुळे ते कधी एकटे पडत असल्याचे कधी जाणवले का असे विचारले असता राणेंनी त्यांची जबाबदारी पार पाडली. ही मंडळी आज कुठे आहेत? काही लोक कणकवली नगरपंचायतची निवडणूकही जिंकू शकले नाहीत. यामुळे ही लोक कुठे आहेत आणि राणे कुठे आहेत, याचा विचार व्हायला हवा, असा टोला त्यांनी शंकर कांबळी, संदेश पारकर यांचे नाव न घेता लगावला. 

तसेच देश महासत्ता बनण्यासाठी जो प्रयत्न करतोय त्यासाठी ही लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. आपल्या देशातील तरुणाईची संख्या जपान, चीनच्या तुलनेत जास्त आहे आणि वाढत जाईल. त्यांची स्वप्ने कशी पूर्ण होतील याकडे ही निवडणूक जाणार असल्याचे सांगतानाच त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. आमच्यासाठी राजकीय दृष्टीकोणातून आणि राज्याच्या राजकारणात आमची जागा काय असेल हे दाखविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचे सांगितले. 

नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशाराExclusive : नारायण राणे त्यांचा 'गेम' करू देतील का?; नितेश राणेंचा 'सेफ गेम'

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेनाmaharashtra swabhimaani pakshमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष