शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: ...म्हणून शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवावी; सांगताहेत धनंजय मुंडे

By राजा माने | Updated: February 13, 2019 17:17 IST

२०१४च्या निवडणुकीआधी पवारांनी स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा लोकसभा लढवावी का, यावरून मतमतांतरं आहेत.

- राजा माने

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाच्या राजकारणातील वजनदार नेते, मोदी सरकारच्या विरोधात महाआघाडीची मोट बांधणारे महागुरू शरद पवार स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अर्थात, 'माढामधून लढण्याच्या नेत्यांच्या आग्रहाबाबत मी विचार करेन', असं सूचक विधान पवारांनीच केल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय. २०१४च्या निवडणुकीआधी पवारांनी स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा लोकसभा लढवावी का, यावरून मतमतांतरं आहेत. परंतु, शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत का उतरलं पाहिजे, याबाबतची राष्ट्रवादीची दुसऱ्या फळीची भूमिका आज पक्षाचे धडाकेबाज नेते धनंजय मुंडे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केली.

'माढा हा राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक ताकद असलेला मतदारसंघ आहे. शरद पवार याआधीही या मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आलेत. आजही या मतदारसंघात अनेक प्रबळ उमेदवार आमच्याकडे आहेत. परंतु, शरद पवार यांनी स्वतः यावेळची निवडणूक लढवल्यास, ही लढाई आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, मतदाराला कळेल, स्वतः सेनापती रणांगणात उतरल्याचं पाहून मावळेही तुटून पडतील. या हेतूनेच अजित पवार, छगन भुजबळ जयंत पाटील, विजयसिंह आणि मी स्वतः पवारांना पुन्हा निवडणूक लढवण्याची गळ घातली', असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. शरद पवारांनी निवडणूक लढवल्यास मतदारांमध्ये १५ टक्क्यांचा स्विंग होऊन त्याचा फायदा राष्ट्रवादीलाच होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. नेता हा पक्ष चालवत असतो. धोरणं ठरवत असतो. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर काही गोष्टी त्याला मान्यही कराव्या लागतात, असं सूचित करतानाच, शरद पवारांनी अद्याप होकार दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी नमूद केलं. 

शरद पवार यांना माढ्याच्या रिंगणात उतरवल्यास ते तिथेच बांधले जातील, हा समज सगळ्यांनीच डोक्यातून काढून टाकावा. कारण, त्यांनी माढ्यामध्ये प्रचार केला नाही, सभा घेतली नाही आणि देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या पहिल्या पाच खासदारांमध्ये शरद पवार असतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.   

गेल्या चार वर्षात विरोधी पक्ष म्हणून काम करताना, सामान्य माणसांच्या प्रश्नावर संघर्ष करून आम्ही गमावलेला विश्वास परत मिळवला आहे. त्या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरेल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. 

शरद पवारांची संपूर्ण मुलाखत...

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Dhananjay Mundeधनंजय मुंडेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस