शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

Exclusive: ...म्हणून शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवावी; सांगताहेत धनंजय मुंडे

By राजा माने | Updated: February 13, 2019 17:17 IST

२०१४च्या निवडणुकीआधी पवारांनी स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा लोकसभा लढवावी का, यावरून मतमतांतरं आहेत.

- राजा माने

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाच्या राजकारणातील वजनदार नेते, मोदी सरकारच्या विरोधात महाआघाडीची मोट बांधणारे महागुरू शरद पवार स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अर्थात, 'माढामधून लढण्याच्या नेत्यांच्या आग्रहाबाबत मी विचार करेन', असं सूचक विधान पवारांनीच केल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय. २०१४च्या निवडणुकीआधी पवारांनी स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा लोकसभा लढवावी का, यावरून मतमतांतरं आहेत. परंतु, शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत का उतरलं पाहिजे, याबाबतची राष्ट्रवादीची दुसऱ्या फळीची भूमिका आज पक्षाचे धडाकेबाज नेते धनंजय मुंडे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केली.

'माढा हा राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक ताकद असलेला मतदारसंघ आहे. शरद पवार याआधीही या मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आलेत. आजही या मतदारसंघात अनेक प्रबळ उमेदवार आमच्याकडे आहेत. परंतु, शरद पवार यांनी स्वतः यावेळची निवडणूक लढवल्यास, ही लढाई आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, मतदाराला कळेल, स्वतः सेनापती रणांगणात उतरल्याचं पाहून मावळेही तुटून पडतील. या हेतूनेच अजित पवार, छगन भुजबळ जयंत पाटील, विजयसिंह आणि मी स्वतः पवारांना पुन्हा निवडणूक लढवण्याची गळ घातली', असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. शरद पवारांनी निवडणूक लढवल्यास मतदारांमध्ये १५ टक्क्यांचा स्विंग होऊन त्याचा फायदा राष्ट्रवादीलाच होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. नेता हा पक्ष चालवत असतो. धोरणं ठरवत असतो. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर काही गोष्टी त्याला मान्यही कराव्या लागतात, असं सूचित करतानाच, शरद पवारांनी अद्याप होकार दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी नमूद केलं. 

शरद पवार यांना माढ्याच्या रिंगणात उतरवल्यास ते तिथेच बांधले जातील, हा समज सगळ्यांनीच डोक्यातून काढून टाकावा. कारण, त्यांनी माढ्यामध्ये प्रचार केला नाही, सभा घेतली नाही आणि देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या पहिल्या पाच खासदारांमध्ये शरद पवार असतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.   

गेल्या चार वर्षात विरोधी पक्ष म्हणून काम करताना, सामान्य माणसांच्या प्रश्नावर संघर्ष करून आम्ही गमावलेला विश्वास परत मिळवला आहे. त्या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरेल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. 

शरद पवारांची संपूर्ण मुलाखत...

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Dhananjay Mundeधनंजय मुंडेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस