शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:12 IST

१०-१२ पक्ष बदलणारे हे लोक, मग खरा गद्दार कोण? आम्ही रडून गेलो नाही. ते रडत गेले. ईडीला घाबरून पक्षप्रवेश करत नाही असा टोलाही कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांना लगावला. 

जालना - काँग्रेसचे माजी आमदार कैलास गौरंट्याल यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मात्र या पक्षप्रवेशाने जालना जिल्ह्यात महायुतीत वादंग निर्माण झाला आहे. कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यातच गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर खोतकरांना गर्भित इशारा दिला आहे. माझ्या नादी लागू नका, माझ्याकडे अनेक फाईल्स आहेत. मी पुराव्यासह बोलतो असं त्यांनी म्हटलं आहे.

माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, माझ्याकडे त्यांच्या एवढ्या फाईल्स आहेत, मी जर तोंड उघडले तर फार पंचाईत होईल. मी पुराव्यासह बोलतो. त्याने सुरुवात केली की मी बोलणार, तो माझ्या नादी लागला तर मी सोडणार नाही. महायुती म्हणून मी काम करणार आहे. मात्र कुणीही मला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर मी तसेच प्रत्युत्तर देणार आहे. मी सुरुवात करणार नाही परंतु पुढून सुरू झाले तर मी संपवणार आहे. याआधी जे बोललो त्यावर पडदा टाका, आता त्या विषयावर बोलत नाही. तो विषय सोडून बोलतो असंही त्यांनी शिंदेसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता म्हटलं आहे. 

तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत किती भ्रष्टाचार झाला सगळ्यांना माहिती आहे. या माणसाच्या मागे २ वेळा ईडी आली होती. मी १०० प्रकरणे काढून दाखवू. अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये होते, मग शिवसेनेत गेले. मग भुजबळ बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत गेला तिथूनही पळून गेला. नारायण राणेंमागेही पळणार होते. विलासराव देशमुखांशी जवळीक साधून काँग्रेसमध्ये येणार होते, त्यानंतर आता शिंदे गटात गेले. १०-१२ पक्ष बदलणारे हे लोक, मग खरा गद्दार कोण? आम्ही रडून गेलो नाही. ते रडत गेले. ईडीला घाबरून पक्षप्रवेश करत नाही असा टोलाही कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांना लगावला. 

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी आमची मागणी आहे. ती मागणी शंभर टक्के पूर्ण होईल असे नाही. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून बोललो, आम्हाला फ्री हँड द्या, भारतीय जनता पार्टीचा महापौर जालना महापालिकेवर बसवू असं सांगितले आहे असंही माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे