शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

EVM मशीन सॅटेलाइटद्वारे भाजपाकडून नियंत्रित केल्या जातात, चंद्रकांत खैरेंचा मोठा आरोप; अमित शहांच्या विधानाचा दिला दाखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 17:00 IST

भाजपाचे नेते आणि गृहमंत्री महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू म्हणतात, बिहारमध्ये ३६ जागा जिंकणार म्हणतात हे कोणत्या आधारावर दावा करत आहेत?

गडचिरोली-

भाजपाचे नेते आणि गृहमंत्री महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू म्हणतात, बिहारमध्ये ३६ जागा जिंकणार म्हणतात हे कोणत्या आधारावर दावा करत आहेत? त्यांच्या दाव्यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे. देशातील निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जात आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. देशात आता निवडणूक मतदानासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरच हवा, अशीही मागणी खैरे यांनी यावेळी केली आहे. 

ठाकरे गटानं राज्यभरात शिवगर्जना अभियानाला सुरुवात केली आहे. या अंतर्गत ठाकरे गटाचे प्रमुख नेते राज्यातील विविध भागांमध्ये मेळावे घेऊन पक्षाला मजबूत करण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शिवगर्जना यात्रेतील दौरा गडचिरोतील आयोजित करण्यात आला होता. यावेळी खैरे यांनी भाजपावर सनसनाटी आरोप केला आहे.

"ईव्हीएम मशीन नको, बॅलेट पेपर हवा अशी मागणी आम्ही आधीपासूनच करत आलो आहोत. अमित शाह मोठमोठ्या घोषणा करतात. महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू, बिहारमध्ये ३६ जागा जिंकू असं ते कोणत्या मुद्द्यावरुन सांगतात. आता जनता ते मान्य करणार नाही. हे सगळं सॅटेलाईटद्वारे नियंत्रित केलं जात आहे. त्यामुळे आम्हाला ईव्हीएम मशीन नको. आम्हाला बॅलेट पेपर हवा आहे", अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. 

मिंधे गटाला मजबूत केलं जातंय"महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे. शिवसेना फोडण्याचं नीच काम मिंधे गटानं केलं आहे. फडणवीसांनी त्यांना स्ट्राँग केलंय. विकासाचं काम नाही. नोकऱ्या नाही. महागाई वाढली. एवढं असतानाही मिंधे गटाला स्ट्राँग केलं जाते. हेच सांगायला मी इथं आलो आहे", असं चंद्रकांत खैरे गडचिरोलीत म्हणाले.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAmit Shahअमित शाह