शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

'सबका टाईम आता है' ! 'ते' वक्तव्य करणारे तावडे आज सभागृहातही नाहीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 14:40 IST

संतप्त झालेल्या आव्हाडांनी तावडेंना आपल्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे आव्हानच दिले होते. नंतर हे प्रकरणी मिटले. तर आव्हाडांनी मंत्र्यांना आव्हान दिल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली होती. 

मुंबई - राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरूनही अंहकार आणि अतिआत्मविश्वासाने ओतप्रोत झालेला भारतीय जनता पक्ष आज विरोधी पक्षाच्या बाकावर बसला आहे. सध्याच्या स्थितीवरून राजकारणात एक पाऊल मागे घेऊन मोठी उडी घेण्याचं कसब असावं लागतं हे राज्यातील भाजप नेतृत्वही विसरलं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र भाजपला अतिआत्मविश्वासच नडल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधी पक्षातील नेत्यांची पक्षाच्या स्थितीवरून टर उडवलेली आहे. यामध्ये फडणवीसांसह तत्कालीन शिक्षणमंत्री देखील आघाडीवर होते. सत्तेत असताना विनोद तावडे यांनी केलेले वक्तव्य आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

सभागृहात चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि तावडे यांच्यात एका मुद्दावरून जुगलबंदी रंगली होती. सभागृह अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आक्रमक झालेल्या आव्हाडांना शांत करण्याचा प्रयत्न  केला. त्याचवेळी तावडे म्हणाले होते की, बोलू द्या त्यांना, या सभागृहात ते पुन्हा येतील की नाही, हे सांगता येत नाही. त्यावेळी संतप्त झालेल्या आव्हाडांनी तावडेंना आपल्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे आव्हानच दिले होते. नंतर हे प्रकरणी मिटले. तर आव्हाडांनी मंत्र्यांना आव्हान दिल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली होती. 

आता तावडे अशाच वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आव्हाड सभागृहात दिसतील की नाही, असा प्रश्न उपस्थित करणारे तावडेच आज सभागृहात नाही. त्यांना भाजपकडून तिकीट देताना डावलण्यात आले आहे. फडणवीस यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. राज्यात विरोधीपक्षनेता आणि विरोधीपक्षच अस्तित्वात राहणार नाही, असं ते म्हणाले होते. मात्र दुर्दैवाने त्यांनाच विरोधीपक्ष नेतेपदाच्या बाकावर बसावे लागले असून ते विरोधकांची भूमिका बजावत आहे.