शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

'सबका टाईम आता है' ! 'ते' वक्तव्य करणारे तावडे आज सभागृहातही नाहीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 14:40 IST

संतप्त झालेल्या आव्हाडांनी तावडेंना आपल्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे आव्हानच दिले होते. नंतर हे प्रकरणी मिटले. तर आव्हाडांनी मंत्र्यांना आव्हान दिल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली होती. 

मुंबई - राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरूनही अंहकार आणि अतिआत्मविश्वासाने ओतप्रोत झालेला भारतीय जनता पक्ष आज विरोधी पक्षाच्या बाकावर बसला आहे. सध्याच्या स्थितीवरून राजकारणात एक पाऊल मागे घेऊन मोठी उडी घेण्याचं कसब असावं लागतं हे राज्यातील भाजप नेतृत्वही विसरलं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र भाजपला अतिआत्मविश्वासच नडल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधी पक्षातील नेत्यांची पक्षाच्या स्थितीवरून टर उडवलेली आहे. यामध्ये फडणवीसांसह तत्कालीन शिक्षणमंत्री देखील आघाडीवर होते. सत्तेत असताना विनोद तावडे यांनी केलेले वक्तव्य आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

सभागृहात चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि तावडे यांच्यात एका मुद्दावरून जुगलबंदी रंगली होती. सभागृह अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आक्रमक झालेल्या आव्हाडांना शांत करण्याचा प्रयत्न  केला. त्याचवेळी तावडे म्हणाले होते की, बोलू द्या त्यांना, या सभागृहात ते पुन्हा येतील की नाही, हे सांगता येत नाही. त्यावेळी संतप्त झालेल्या आव्हाडांनी तावडेंना आपल्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे आव्हानच दिले होते. नंतर हे प्रकरणी मिटले. तर आव्हाडांनी मंत्र्यांना आव्हान दिल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली होती. 

आता तावडे अशाच वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आव्हाड सभागृहात दिसतील की नाही, असा प्रश्न उपस्थित करणारे तावडेच आज सभागृहात नाही. त्यांना भाजपकडून तिकीट देताना डावलण्यात आले आहे. फडणवीस यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. राज्यात विरोधीपक्षनेता आणि विरोधीपक्षच अस्तित्वात राहणार नाही, असं ते म्हणाले होते. मात्र दुर्दैवाने त्यांनाच विरोधीपक्ष नेतेपदाच्या बाकावर बसावे लागले असून ते विरोधकांची भूमिका बजावत आहे.