शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

'सबका टाईम आता है' ! 'ते' वक्तव्य करणारे तावडे आज सभागृहातही नाहीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 14:40 IST

संतप्त झालेल्या आव्हाडांनी तावडेंना आपल्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे आव्हानच दिले होते. नंतर हे प्रकरणी मिटले. तर आव्हाडांनी मंत्र्यांना आव्हान दिल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली होती. 

मुंबई - राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरूनही अंहकार आणि अतिआत्मविश्वासाने ओतप्रोत झालेला भारतीय जनता पक्ष आज विरोधी पक्षाच्या बाकावर बसला आहे. सध्याच्या स्थितीवरून राजकारणात एक पाऊल मागे घेऊन मोठी उडी घेण्याचं कसब असावं लागतं हे राज्यातील भाजप नेतृत्वही विसरलं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र भाजपला अतिआत्मविश्वासच नडल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधी पक्षातील नेत्यांची पक्षाच्या स्थितीवरून टर उडवलेली आहे. यामध्ये फडणवीसांसह तत्कालीन शिक्षणमंत्री देखील आघाडीवर होते. सत्तेत असताना विनोद तावडे यांनी केलेले वक्तव्य आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

सभागृहात चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि तावडे यांच्यात एका मुद्दावरून जुगलबंदी रंगली होती. सभागृह अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आक्रमक झालेल्या आव्हाडांना शांत करण्याचा प्रयत्न  केला. त्याचवेळी तावडे म्हणाले होते की, बोलू द्या त्यांना, या सभागृहात ते पुन्हा येतील की नाही, हे सांगता येत नाही. त्यावेळी संतप्त झालेल्या आव्हाडांनी तावडेंना आपल्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे आव्हानच दिले होते. नंतर हे प्रकरणी मिटले. तर आव्हाडांनी मंत्र्यांना आव्हान दिल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली होती. 

आता तावडे अशाच वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आव्हाड सभागृहात दिसतील की नाही, असा प्रश्न उपस्थित करणारे तावडेच आज सभागृहात नाही. त्यांना भाजपकडून तिकीट देताना डावलण्यात आले आहे. फडणवीस यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. राज्यात विरोधीपक्षनेता आणि विरोधीपक्षच अस्तित्वात राहणार नाही, असं ते म्हणाले होते. मात्र दुर्दैवाने त्यांनाच विरोधीपक्ष नेतेपदाच्या बाकावर बसावे लागले असून ते विरोधकांची भूमिका बजावत आहे.