शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

"विशाळगडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे, मग ते वेळीच काढून का घेतले नाही?’’, संभाजीराजे छत्रपतींचा सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 18:16 IST

Sambhaji Raje Chhatrapati News: अतिक्रमण करणे ही बाब कोणत्या कायद्यात बसते, हे अतिक्रमण केलेल्यांचा पुळका येणाऱ्यांनाच माहिती! गडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे, मग वेळीच ते काढून का घेतले नाही? शिवभक्तांची वाट बघत होता का? हे प्रश्न या अतिक्रमणांचा पुळका येणाऱ्यांना पडत नाहीत का? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी विशाळगडाकडे कूच करण्याची घोषणाही केली होती. त्यानंतर विशाळगडावर शिवभक्तांनी अनेक अतिक्रमाणांची तोडफोड केली होती. तसेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर सरकारने अतिक्रमाणांविरोधात कारवाई करण्याच्या दिशेने पावलं टाकली होती. तसेच विशाळगडाच्या परिसरात हिंसक तोडफोड करणाऱ्या अनेक शिवभक्तांवर गुन्हेही दाखल केले होते. तसेच विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही टीका झाली होती. दरम्यान, आता या सर्व टीकाकारांना संभाजीराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. गडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे, मग वेळीच ते काढून का घेतले नाही? शिवभक्तांची वाट बघत होता का? हे प्रश्न या अतिक्रमणांचा पुळका येणाऱ्यांना पडत नाहीत का?, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे. 

यासंदर्भात सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, अतिक्रमण करणे ही बाब कोणत्या कायद्यात बसते, हे अतिक्रमण केलेल्यांचा पुळका येणाऱ्यांनाच माहिती! आम्ही कायदा पाळणारे आणि कायद्याचा सन्मान करणारे राष्ट्रभक्त भारतीय आहोत. सरकारने विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करावे, ही आमची मागणी होती आणि या मागणीची उशीरा का असेना पण दखल घेऊन दुसऱ्याच दिवशीपासून विशाळगडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त होण्यास सुरुवात झाली. यावेळी गडपायथ्याला उपस्थित शिवभक्तांनी सविनय मार्गानेच आपली मागणी मांडण्याचे आवाहन आम्ही वेळोवेळी करत होतो आणि शिवभक्तांनी यास सकारात्मक प्रतिसाद देखील दिला. इतर काही अनुचित प्रकार घडले त्याचे समर्थन निश्चितच नाही; मात्र हे पोलिस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे घडलेले आहे. आपल्या चुका आणि बेजबाबदारपणा झाकण्यासाठी प्रशासन कोणतीही शहानिशा न करता माझ्यासहित शिवभक्तांवर चुकीचे गुन्हे दाखल करत आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

ज्यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमणे केली, विशाळगड सारख्या ऐतिहासिक संरक्षित स्मारकाचे आणि त्याच्या इतिहासाचे नुकसान केले, ज्यांनी या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्यांना कोणता गुन्हा लावणार आहे ? हा कायद्याचा कोणता सन्मान आहे ? गडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे, मग वेळीच ते काढून का घेतले नाही? शिवभक्तांची वाट बघत होता का? हे प्रश्न या अतिक्रमणांचा पुळका येणाऱ्यांना पडत नाहीत का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.    

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र