शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"विशाळगडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे, मग ते वेळीच काढून का घेतले नाही?’’, संभाजीराजे छत्रपतींचा सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 18:16 IST

Sambhaji Raje Chhatrapati News: अतिक्रमण करणे ही बाब कोणत्या कायद्यात बसते, हे अतिक्रमण केलेल्यांचा पुळका येणाऱ्यांनाच माहिती! गडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे, मग वेळीच ते काढून का घेतले नाही? शिवभक्तांची वाट बघत होता का? हे प्रश्न या अतिक्रमणांचा पुळका येणाऱ्यांना पडत नाहीत का? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी विशाळगडाकडे कूच करण्याची घोषणाही केली होती. त्यानंतर विशाळगडावर शिवभक्तांनी अनेक अतिक्रमाणांची तोडफोड केली होती. तसेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर सरकारने अतिक्रमाणांविरोधात कारवाई करण्याच्या दिशेने पावलं टाकली होती. तसेच विशाळगडाच्या परिसरात हिंसक तोडफोड करणाऱ्या अनेक शिवभक्तांवर गुन्हेही दाखल केले होते. तसेच विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही टीका झाली होती. दरम्यान, आता या सर्व टीकाकारांना संभाजीराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. गडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे, मग वेळीच ते काढून का घेतले नाही? शिवभक्तांची वाट बघत होता का? हे प्रश्न या अतिक्रमणांचा पुळका येणाऱ्यांना पडत नाहीत का?, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे. 

यासंदर्भात सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, अतिक्रमण करणे ही बाब कोणत्या कायद्यात बसते, हे अतिक्रमण केलेल्यांचा पुळका येणाऱ्यांनाच माहिती! आम्ही कायदा पाळणारे आणि कायद्याचा सन्मान करणारे राष्ट्रभक्त भारतीय आहोत. सरकारने विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करावे, ही आमची मागणी होती आणि या मागणीची उशीरा का असेना पण दखल घेऊन दुसऱ्याच दिवशीपासून विशाळगडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त होण्यास सुरुवात झाली. यावेळी गडपायथ्याला उपस्थित शिवभक्तांनी सविनय मार्गानेच आपली मागणी मांडण्याचे आवाहन आम्ही वेळोवेळी करत होतो आणि शिवभक्तांनी यास सकारात्मक प्रतिसाद देखील दिला. इतर काही अनुचित प्रकार घडले त्याचे समर्थन निश्चितच नाही; मात्र हे पोलिस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे घडलेले आहे. आपल्या चुका आणि बेजबाबदारपणा झाकण्यासाठी प्रशासन कोणतीही शहानिशा न करता माझ्यासहित शिवभक्तांवर चुकीचे गुन्हे दाखल करत आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

ज्यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमणे केली, विशाळगड सारख्या ऐतिहासिक संरक्षित स्मारकाचे आणि त्याच्या इतिहासाचे नुकसान केले, ज्यांनी या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्यांना कोणता गुन्हा लावणार आहे ? हा कायद्याचा कोणता सन्मान आहे ? गडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे, मग वेळीच ते काढून का घेतले नाही? शिवभक्तांची वाट बघत होता का? हे प्रश्न या अतिक्रमणांचा पुळका येणाऱ्यांना पडत नाहीत का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.    

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र