शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दरवेळी कोर्टात जावे लागते, लढाईच्या क्षणाची वाट बघतोय; उद्धव ठाकरेंचे भुजबळांच्या कार्यक्रमात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 05:37 IST

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

द्वेष पसरवणाऱ्या शक्तींविरोधात लढायचे आहे : फारूख अब्दुल्ला   छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात अनेक नेत्यांची जोरदार फटकेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काही शक्तींकडून द्वेष पसरवला जात आहे. देशातील लोकांमध्ये विभागणी केली जात आहे. या शक्ती देशाला कमजोर करणार असून, त्याविरोधात लढायचे आहे. तरच हा भारत मजबूत होऊ शकेल, असे आवाहन जम्मू ॲण्ड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी मुंबईत बोलताना केले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भुजबळांबद्दल गौरवोद्गार काढले. 

आज देशाची अवस्था काय आहे ते बघा. महागाई कुठे पोहोचली आहे. गरीब पिचला जातोय. मुले शिकलेली आहेत, पण नोकरी नाही. देव आणि अल्लाच या संकटातून बाहेर काढू शकतो, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.राजकीय पार्श्वभूमी नसताना एखादी व्यक्ती महापौर होते, विरोधी पक्षनेते, मंत्री, उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचते आणि महाराष्ट्राला दिशा देते, असे उदाहरण म्हणजे छगन भुजबळ, अशा शब्दांत शरद पवारांनी भुजबळांवर कौतुकाचा वर्षाव केला. प्रफुल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख बाळासाहेबांचे खरे वारसदार असा केल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

लढाईच्या क्षणाची वाट बघतोय शिवसेनेने अनेक वादळे अंगावर घेतली. मात्र त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी ही वादळे व वादळ निर्माण करणारे शरद पवार सोबत नव्हते. आता हे सगळे सोबत असताना मी लढाईच्या क्षणाची वाट बघतो आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावे लागते. हिम्मत असेल तर मैदानात या, माझी तयारी आहे, असे आव्हान त्यांनी दिले.

शिवसेनेचे १५ आमदार गेले त्यावेळी ठाकरे यांनी त्यांना परत आणायची जबाबदारी भुजबळांना दिली असती तर ते त्यांना माघारी घेऊन आले असते आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असते.    - अजित पवार, राष्ट्रवादी

पुन्हा एकदा लढाई सुरू झाली आहे. यात मशालीबरोबर हात आहे आणि हाताबरोबर घड्याळ आहे. चिंता करू नका.     - बाळासाहेब थोरात, काँग्रेस

प्रत्येकाची विचारधारा मान्य करण्याची या देशाची परंपरा आहे. यामुळेच लोकशाही जिवंत राहते. जिथे जिथे आम्ही बोलतोच ते योग्य तिथे लोकशाही कशी असू शकेल ?      जावेद अख्तर, गीतकार

भुजबळ झाले भावनिक आम्ही खूप कष्ट घेतले. सकाळी तीन वाजता मार्केटमध्ये जायचो, भाजी विकायचो. लोक बोलतात एवढी संपत्ती कुठून आली, अरे लहानपणापासून मेहनत केली आहे, अशा आठवणींना भुजबळांनी यावेळी उजाळा दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेChagan Bhujbalछगन भुजबळ