शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 14:56 IST

"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी... यांचं डोकं चोरी झालेलं आहे.  त्यातला दिमाग चोरी झालेला आहे," अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

सध्या विरोधकांकडून भाजपवर मतचोरीचा आरोप होत आहे. यासंदर्भात बोलताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला आहे. "तुमच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला अभूतपूर्व यश मिळालं. तुम्ही या यशाने आनंदी आहात. पण काही लोकांचे अजूनही समाधान झालेले नाही. ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत मिळाले, तरीही सुधारायला तयार नाहीत. रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी... यांचं डोकं चोरी झालेलं आहे.  त्यातला दिमाग चोरी झालेला आहे," अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. ते शनिवारी मुंबईत ओयोजित 'राखी प्रदान' कार्यक्रमात बोलत होते.

प्रदेश भाजप महिला आघाडीच्या वतीने आमदार चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात, राज्यभरातील ३६ लाख ७८ हजार भगिनींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना राख्या पाठविल्या, या निमित्ताने या ''राखी प्रदान' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे फडणवीस म्हणाले, "माझी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की, यांच्यासाठीही २५ टक्के आशीर्वाद मागा की, यांना सुबुद्धी येवो, यांच्या डोक्यात थोडी अक्कल येवो. कारण खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर, यांच्या पेक्षा मोठे चोर कोण आहेत? तर कोणीच नाही. म्हणून त्याची चिंता करण्याचे कारण नाही."

मोदींच्या पाठीशी संपूर्ण देशाची मातृशक्ती उभी आहे -"हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते. आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पण, ना यांना परदेशात कुणी विचारलं, ना यांना बिहारमध्ये कुणी विचारणार आहे, जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली, तीच परिस्थिती यांची बिहारमध्ये होणार आहे. कारण, मोदीजींसारखा नेता, जो देशाचा विचार करतो, जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण देशाची मातृशक्ती उभी आहे," असे फडणवीस म्हणाले. 

विश्लेषक सांगतात की, मोदीजी का जिंकले? तर... -याशिवाय, "तुम्ही कुठलीही निवडणूक बघा. मोजी आल्यापासून २०१४ पासून जेवढ्या निवडणुका भाजप जिंकला, या प्रत्येक निवडणुकीचे जेव्हा विश्लेषण होते, तेव्हा विश्लेषक सांगतात की, मोदीजी का जिंकले? तर मोदीजींना पुरुषांच्या तुलनेत महिलांनी पाच टक्के मतं अधिक दिले. हे प्रत्येक निवडणुकीचे विश्लेषण असते. कारण महिलांना माहीत आहे की, खऱ्या अर्थाने आपल्या येणाऱ्या पीढ्याचे कल्ल्याण जर कुणी करणार आहे, तर ते मोदीजीच करणार आहेत," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWomenमहिलाBJPभाजपाMumbaiमुंबईcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना