शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
4
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
5
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
6
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
7
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
8
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
9
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
10
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
11
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
12
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
13
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
14
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
15
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
16
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
17
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
18
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
19
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
20
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?

"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 14:56 IST

"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी... यांचं डोकं चोरी झालेलं आहे.  त्यातला दिमाग चोरी झालेला आहे," अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

सध्या विरोधकांकडून भाजपवर मतचोरीचा आरोप होत आहे. यासंदर्भात बोलताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला आहे. "तुमच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला अभूतपूर्व यश मिळालं. तुम्ही या यशाने आनंदी आहात. पण काही लोकांचे अजूनही समाधान झालेले नाही. ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत मिळाले, तरीही सुधारायला तयार नाहीत. रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी... यांचं डोकं चोरी झालेलं आहे.  त्यातला दिमाग चोरी झालेला आहे," अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. ते शनिवारी मुंबईत ओयोजित 'राखी प्रदान' कार्यक्रमात बोलत होते.

प्रदेश भाजप महिला आघाडीच्या वतीने आमदार चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात, राज्यभरातील ३६ लाख ७८ हजार भगिनींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना राख्या पाठविल्या, या निमित्ताने या ''राखी प्रदान' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे फडणवीस म्हणाले, "माझी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की, यांच्यासाठीही २५ टक्के आशीर्वाद मागा की, यांना सुबुद्धी येवो, यांच्या डोक्यात थोडी अक्कल येवो. कारण खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर, यांच्या पेक्षा मोठे चोर कोण आहेत? तर कोणीच नाही. म्हणून त्याची चिंता करण्याचे कारण नाही."

मोदींच्या पाठीशी संपूर्ण देशाची मातृशक्ती उभी आहे -"हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते. आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पण, ना यांना परदेशात कुणी विचारलं, ना यांना बिहारमध्ये कुणी विचारणार आहे, जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली, तीच परिस्थिती यांची बिहारमध्ये होणार आहे. कारण, मोदीजींसारखा नेता, जो देशाचा विचार करतो, जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण देशाची मातृशक्ती उभी आहे," असे फडणवीस म्हणाले. 

विश्लेषक सांगतात की, मोदीजी का जिंकले? तर... -याशिवाय, "तुम्ही कुठलीही निवडणूक बघा. मोजी आल्यापासून २०१४ पासून जेवढ्या निवडणुका भाजप जिंकला, या प्रत्येक निवडणुकीचे जेव्हा विश्लेषण होते, तेव्हा विश्लेषक सांगतात की, मोदीजी का जिंकले? तर मोदीजींना पुरुषांच्या तुलनेत महिलांनी पाच टक्के मतं अधिक दिले. हे प्रत्येक निवडणुकीचे विश्लेषण असते. कारण महिलांना माहीत आहे की, खऱ्या अर्थाने आपल्या येणाऱ्या पीढ्याचे कल्ल्याण जर कुणी करणार आहे, तर ते मोदीजीच करणार आहेत," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWomenमहिलाBJPभाजपाMumbaiमुंबईcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना