शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

अखेर, जरांगे यांचे आमरण उपोषण मागे; आता साखळी उपोषण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 06:05 IST

ओबीसीतूनच आरक्षण, सगेसोयरे मुद्द्यांवर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्क जालना: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी समाज बांधवांच्या विनंतीनुसार सोमवारी आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषण सुरू केले. संचारबंदीमुळे समाज बांधवांना अंतरवाली सराटीत येता येत नाही. त्यामुळे दोन-चार दिवस उपचार घेऊन राज्यातील गावागावांत जाऊन समाज बांधवांशी संवाद साधणार आहे. 'सग्यासोयऱ्यां'ची अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

रविवारी रात्री पाच हजार महिला, २५ हजार लोक सोबत होते. त्यांना काहीतरी घडवून आणायचे होते. पोलिस आणि मराठ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली असती, तर दुसऱ्यांदा अंतरवाली सराटीत रात्री किंवा सकाळी लाठीचार्ज झाला असता, तर राज्यातील मराठा पेटून उठला असता. माझ्यावर यापूर्वीही वेगवेगळ्या पक्षांचे नाव घेऊन आरोप झाले. परंतु राजकारण आपल्या डोक्यातच नाही. आपल्याला समाजाला आरक्षण द्यायचे आहे. यामुळे अधिवेशनात सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. तुम्हाला संधी आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नये. तुम्ही चक्रव्यूह रचले होते, परंतु आम्ही डाव उधळून लावला आहे. नवनवीन डाव टाकून नाराजी ओढावून घेऊ नका. या अधिवेशनात सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. १० टक्के आरक्षण मी स्वीकारू शकत नाही. ओबीसीतूनच आरक्षण हवे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण