शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Maharashtra Election 2019; झोपेतही अमित शहा ३७०-३७० च म्हणत असतील : शरद पवारांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 19:21 IST

 बार्शी येथील राष्ट्रवादीच्या सभेत नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली टीका

ठळक मुद्दे- बार्शी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रचार सभा- शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केली जोरदार टीका- सरकारच्या कामाबद्दल शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी

सोलापूर/बार्शी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जिकडे जातील तिकडे ३७०-३७० असे करीत आहेत. काश्मीरमधील ३७० रद्द केले, त्याचा आम्हाला आनंद आहे व आमचा पाठिंबाही आहे. पण कोण चाललंय जमीन घ्याला काश्मीरला. दिवस-रात्र अमित शहा ३७०-३७० म्हणत आहेत़ रात्री झोपेतही ३७० म्हणत असतील, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहा यांना यांच्यावर केली़

बार्शी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, मी ५२ वर्षे निवडून जातोय़ मतदार उगीच आम्हाला निवडून देत नाहीत़ आम्हाला काय केले म्हणणाºयांनी शिवस्मारकाचे काय झाले, इंदू मिलचे काय झाले, असा सवाल करत महाराजांच्या नावाची खोटी आश्वासने या सरकारने दिली आहेत. आम्ही शिवरायांची परंपरा जतन केली. मात्र हे सरकार शिवरायांचे किल्ले पर्यटनासाठी खुले करण्याचा ठराव करते आहे. किल्ल्यावर आता तलवारींच्या खणखणाटाऐवजी झमझम पाहिजे काय? शिवराय व बाबासाहेबांच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करीत आहे हे लोकांना कळून चुकले आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

भाजप सरकारच्या कार्यकाळात शेती व शेतकरी अडचणीत सापडला आहे. १६ हजार शेतकºयांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत, मग ही कसली कर्जमाफी. शेतकºयांची फसवणूक करणारी यांच्यासारखी दुसरी राजवट नाही, अशी टीका पवार यांनी केली. आम्ही आजवर टेंभुर्णी, इंदापूर, कुरकुंभ, चाकण अशा कितीतरी औद्योगिक वसाहती उभ्या केल्या. हजारो कारखाने काढून बेरोजगारांच्या हातांना काम दिले. यांच्या राजवटीत कारखाने बंद पडायला लागले आहेत. आर्यन कारखानाही बंद आहे, मग यांना मत का द्यायचे असा प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांचे नागपूर हे गुन्हेगाराचे केंद्र बनले आहे. भाजपचे अनेक स्वामी महिलांवर अत्याचार करीत आहेत. अशा बेशरम माणसांना त्यांची जागा दाखवा. महिलांना सन्मान नाही, हाच का शिवछत्रपतींचा आदर्श, काय चाललंय या राज्यात? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणbarshi-acबार्शी