शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

"कुणाच्याही हाती रिमोट राहू द्या, मतभेद असले तरी..."; मविआबाबत शरद पवारांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 13:49 IST

कांदा नाही तर सगळ्या पिकांची परिस्थिती चांगली नाही. सरकारचे धोरण चुकत आहेत.

छत्रपती संभाजीनगर - मतभेद असले तरी एकत्र येऊन पर्याय देण्याचे काम विरोधकांनी करावे. कोणाच्याही हातात रिमोट राहू द्या पण विरोधक एकत्र आले पाहिजे. नेतृत्व कोणाकडे राहू द्या, लोकांनी बदल घेण्याचा निर्णय घेतल्यास बदल होतो. मतदार राजा असतो तो बदल घडवतो. १९७७ आणि २०२३ देशातील परिस्थिती सारखी आहे. आता तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शरद पवार म्हणाले की, राज्यकर्त्यांचे लक्ष पायाभूत सुविधांकडे अधिक असायला हवे. राज्यातील निकाल पाहता भाजप विरोधी निकाल आहे. बहुतांश राज्यात सत्ता भाजपची नाही. मोजक्या राज्यात त्यांची सत्ता आहे. लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते हे चित्र कायम राहील तर बदल घडेल. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या दोन सदस्यांनी बैठकीत भाग घेतला. त्यात आता जागा वाटपाबाबत चर्चा होईल. चार जागा लढवताना दहा जागा मागितल्या जातात. मात्र शेवटी चार जागा दिल्या जातात. प्रत्येकाची ताकद पाहून जागा दिल्या जातील, असे शरद पवार यांनी सांगितले. राज्यात निवडणुकीच्या चर्चा असल्या तरी भाजपची निवडणुकीला समोर जाण्याची तयारी आहे असे दिसत नाही. इतर राज्यात झालेल्या निवडणूक निकाल पाहता, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या होतील, असे मला वाटत असल्याचे देखील शरद पवार यांनी सांगितले.

तसेच कांदा नाही तर सगळ्या पिकांची परिस्थिती चांगली नाही. सरकारचे धोरण चुकत आहेत. निर्यात बंद आहे. जिथे भाव भेटतो तिथे माल पाठवत नाही आणि इथे भाव देत नाहीत. शेतकऱ्याच्या घरात अर्ध्याहून अधिक कापूस शिल्लक आहे. परिस्थिती चांगली नाही. सरकारने जर न्याय दिला नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल, त्यावेळी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसोबत राहील. हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्यानुसार पाऊस लांबेल मात्र महाराष्ट्रात शंभर टक्के जवळपास पाऊस पडेल त्यामुळे चिंता करण्याचे काम नाही अस शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, नगर येथील कार्यक्रम पावसाचा अंदाज असल्याने रद्द केला. पाऊस पडल्यास चिखल होईल त्रास झाला असता म्हणून तो रद्द केला. पेशव्यांना बाबत केलेले वक्तव्य विचारसरणी नुसार आहे. लव्ह जिहाद बाबत आपण बोलणे म्हणजे नाही विनाकारण अशा प्रश्नांवर बोलणे चुकीचे आहे. भाजपा विरोधात आम्ही आक्रमकपणे समोर जात आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले. तर बीआरएस राज्यात आला, आता बघू काय होईल असं शरद पवारांनी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस