शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

"कुणाच्याही हाती रिमोट राहू द्या, मतभेद असले तरी..."; मविआबाबत शरद पवारांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 13:49 IST

कांदा नाही तर सगळ्या पिकांची परिस्थिती चांगली नाही. सरकारचे धोरण चुकत आहेत.

छत्रपती संभाजीनगर - मतभेद असले तरी एकत्र येऊन पर्याय देण्याचे काम विरोधकांनी करावे. कोणाच्याही हातात रिमोट राहू द्या पण विरोधक एकत्र आले पाहिजे. नेतृत्व कोणाकडे राहू द्या, लोकांनी बदल घेण्याचा निर्णय घेतल्यास बदल होतो. मतदार राजा असतो तो बदल घडवतो. १९७७ आणि २०२३ देशातील परिस्थिती सारखी आहे. आता तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शरद पवार म्हणाले की, राज्यकर्त्यांचे लक्ष पायाभूत सुविधांकडे अधिक असायला हवे. राज्यातील निकाल पाहता भाजप विरोधी निकाल आहे. बहुतांश राज्यात सत्ता भाजपची नाही. मोजक्या राज्यात त्यांची सत्ता आहे. लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते हे चित्र कायम राहील तर बदल घडेल. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या दोन सदस्यांनी बैठकीत भाग घेतला. त्यात आता जागा वाटपाबाबत चर्चा होईल. चार जागा लढवताना दहा जागा मागितल्या जातात. मात्र शेवटी चार जागा दिल्या जातात. प्रत्येकाची ताकद पाहून जागा दिल्या जातील, असे शरद पवार यांनी सांगितले. राज्यात निवडणुकीच्या चर्चा असल्या तरी भाजपची निवडणुकीला समोर जाण्याची तयारी आहे असे दिसत नाही. इतर राज्यात झालेल्या निवडणूक निकाल पाहता, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या होतील, असे मला वाटत असल्याचे देखील शरद पवार यांनी सांगितले.

तसेच कांदा नाही तर सगळ्या पिकांची परिस्थिती चांगली नाही. सरकारचे धोरण चुकत आहेत. निर्यात बंद आहे. जिथे भाव भेटतो तिथे माल पाठवत नाही आणि इथे भाव देत नाहीत. शेतकऱ्याच्या घरात अर्ध्याहून अधिक कापूस शिल्लक आहे. परिस्थिती चांगली नाही. सरकारने जर न्याय दिला नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल, त्यावेळी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसोबत राहील. हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्यानुसार पाऊस लांबेल मात्र महाराष्ट्रात शंभर टक्के जवळपास पाऊस पडेल त्यामुळे चिंता करण्याचे काम नाही अस शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, नगर येथील कार्यक्रम पावसाचा अंदाज असल्याने रद्द केला. पाऊस पडल्यास चिखल होईल त्रास झाला असता म्हणून तो रद्द केला. पेशव्यांना बाबत केलेले वक्तव्य विचारसरणी नुसार आहे. लव्ह जिहाद बाबत आपण बोलणे म्हणजे नाही विनाकारण अशा प्रश्नांवर बोलणे चुकीचे आहे. भाजपा विरोधात आम्ही आक्रमकपणे समोर जात आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले. तर बीआरएस राज्यात आला, आता बघू काय होईल असं शरद पवारांनी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस