शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

"कुणाच्याही हाती रिमोट राहू द्या, मतभेद असले तरी..."; मविआबाबत शरद पवारांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 13:49 IST

कांदा नाही तर सगळ्या पिकांची परिस्थिती चांगली नाही. सरकारचे धोरण चुकत आहेत.

छत्रपती संभाजीनगर - मतभेद असले तरी एकत्र येऊन पर्याय देण्याचे काम विरोधकांनी करावे. कोणाच्याही हातात रिमोट राहू द्या पण विरोधक एकत्र आले पाहिजे. नेतृत्व कोणाकडे राहू द्या, लोकांनी बदल घेण्याचा निर्णय घेतल्यास बदल होतो. मतदार राजा असतो तो बदल घडवतो. १९७७ आणि २०२३ देशातील परिस्थिती सारखी आहे. आता तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शरद पवार म्हणाले की, राज्यकर्त्यांचे लक्ष पायाभूत सुविधांकडे अधिक असायला हवे. राज्यातील निकाल पाहता भाजप विरोधी निकाल आहे. बहुतांश राज्यात सत्ता भाजपची नाही. मोजक्या राज्यात त्यांची सत्ता आहे. लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते हे चित्र कायम राहील तर बदल घडेल. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या दोन सदस्यांनी बैठकीत भाग घेतला. त्यात आता जागा वाटपाबाबत चर्चा होईल. चार जागा लढवताना दहा जागा मागितल्या जातात. मात्र शेवटी चार जागा दिल्या जातात. प्रत्येकाची ताकद पाहून जागा दिल्या जातील, असे शरद पवार यांनी सांगितले. राज्यात निवडणुकीच्या चर्चा असल्या तरी भाजपची निवडणुकीला समोर जाण्याची तयारी आहे असे दिसत नाही. इतर राज्यात झालेल्या निवडणूक निकाल पाहता, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या होतील, असे मला वाटत असल्याचे देखील शरद पवार यांनी सांगितले.

तसेच कांदा नाही तर सगळ्या पिकांची परिस्थिती चांगली नाही. सरकारचे धोरण चुकत आहेत. निर्यात बंद आहे. जिथे भाव भेटतो तिथे माल पाठवत नाही आणि इथे भाव देत नाहीत. शेतकऱ्याच्या घरात अर्ध्याहून अधिक कापूस शिल्लक आहे. परिस्थिती चांगली नाही. सरकारने जर न्याय दिला नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल, त्यावेळी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसोबत राहील. हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्यानुसार पाऊस लांबेल मात्र महाराष्ट्रात शंभर टक्के जवळपास पाऊस पडेल त्यामुळे चिंता करण्याचे काम नाही अस शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, नगर येथील कार्यक्रम पावसाचा अंदाज असल्याने रद्द केला. पाऊस पडल्यास चिखल होईल त्रास झाला असता म्हणून तो रद्द केला. पेशव्यांना बाबत केलेले वक्तव्य विचारसरणी नुसार आहे. लव्ह जिहाद बाबत आपण बोलणे म्हणजे नाही विनाकारण अशा प्रश्नांवर बोलणे चुकीचे आहे. भाजपा विरोधात आम्ही आक्रमकपणे समोर जात आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले. तर बीआरएस राज्यात आला, आता बघू काय होईल असं शरद पवारांनी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस