शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

खरेदीखतावर नाव असले तरी संपत्तीचा वारस नाही - उच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 02:53 IST

एखाद्या व्यक्तीच्या स्वअर्जित भूखंडाच्या खरेदीखतावर त्याच्या मुलांची नावे आहेत, याचा अर्थ खरेदीखत केलेल्या दिवसापासून ती मुले त्या संपत्तीची वारस ठरतात, असा नाही.

- दीप्ती देशमुखमुंबई - एखाद्या व्यक्तीच्या स्वअर्जित भूखंडाच्या खरेदीखतावर त्याच्या मुलांची नावे आहेत, याचा अर्थ खरेदीखत केलेल्या दिवसापासून ती मुले त्या संपत्तीची वारस ठरतात, असा नाही. तर जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्युपत्रात त्याच्या वारसदारांच्या नावाचा उल्लेख असेल, तरच संबंधित त्या भूखंडामध्ये हिस्सा मागू शकतात, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.पुण्यातील हवेली तालुक्यातील उल्काबाई जाधव (बदललेले नाव) यांनी स्वत:च्या कमाईतून १९२२ मध्ये एक भूखंड खरेदी केला. या भूखंडाच्या खरेदीखतावर त्यांनी त्यांच्या गणपत, राम, लक्ष्मण (बदललेली नावे) या तीन अल्पवयीन मुलांची नावे नमूद केली. त्यापैकी गणपतचा तरुणवयात मृत्यू झाला. तर सर्वात छोटा भाऊ लक्ष्मण याला दत्तक देण्यात आले. राम यांच्या दोन पत्नींचा मृत्यू झाला. त्यांनी तिसरा विवाह झाला. मात्र, रामशी पटत नसल्याने त्यांच्या पत्नी यमुना (बदललेले नाव) आपल्या भावाबरोबर राहत आहेत. राम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने संपूर्ण भूखंडाचे मालक आपण असल्याचा दावा केला. तर लक्ष्मण व त्यांच्या मुलांनीही या जमिनीवर दावा केला. लक्ष्मण यांनी खरेदीखतावर आपले नाव असल्याचे दाखविले तर त्यांचा मुलगा किरणने (बदललेले नाव) राम याने आपल्याला दत्तक घेतल्याचे दिवाणी न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने यमुना आणि किरण या दोघांना संबंधित भूखंडाचा समान वाटा देत त्यांचा अर्ज निकाली काढला.या निर्णयाला यमुना, लक्ष्मण आणि लक्ष्मणच्या मुलाने फर्स्ट अपील न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर न्यायालयाने लक्ष्मण व त्याच्या मुलाचा दावा फेटाळत यमुना हिला संपत्तीचे मालक म्हणून जाहीर केले. या निर्णयाला लक्ष्मण व किरणने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या अपिलावरील सुनावणी न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.लक्ष्मण यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आईने त्याला दत्तक देण्यापूर्वी भूखंडाच्या खरेदीखतावर त्याचे नाव घातले आहे. आई व दोन्ही भावांचे निधन झाल्याने संपूर्ण भूखंड आपल्याच नावावर करण्यात यावा.यमुनाच्या वकिलांनी यावर आक्षेप घेतला. उल्काबाई यांनी खरेदीखतावर तिन्ही मुलांची नावे घातली असली तरी भूखंडाचा हिस्सा हिंदू वारसा कायद्याप्रमाणे करावा लागेल. कारण उल्काबाई यांनी हा भूखंड स्वत:च्या उत्पन्नातून खरेदी केला आहे. संबंधित भूखंड हा वडिलोपार्जित किंवा एकत्र कुटुंबाचा नाही. त्यामुळे वारसदार जिवंत आहे की नाही, यावरून भूखंडाचा हिस्सा केला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद यमुनाच्या वकिलांनी न्यायालयात केला.त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. उल्काबाई यांनी त्यांच्या तिन्ही अल्पवयीन मुलांची नावे खरेदीखतावर घातली म्हणून ते अमलात आणले त्याच दिवसापासून संबंधित भूखंड त्यांच्या नावे झाला, हे मान्य करणे कठीण आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.मालक यमुनाचसंबंधित भूखंड उल्काबाई यांचा स्वअर्जित आहे. त्यामुळे हा भूखंड खरेदी केल्यानंतर लगेचच लक्ष्मण त्यावर दावा करू शकत नाही. उल्का यांचीही स्वअर्जित संपत्ती असल्याने त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांचे मृत्युपत्र उघडल्यानंतरच त्यांच्या संपत्तीचे वारसदार ठरू शकतात. मात्र, त्यांच्या मृत्यूपूर्वीच लक्ष्मण यांना दत्तक देण्यात आले होते आणि गणपतचा मृत्यू झाला. त्यामुळे राम यांच्या पश्चात या संपूर्ण भूखंडाची मालक यमुना आहेत, असे म्हणत न्यायालयाने लक्ष्मण व किरणचा अपील फेटाळला. 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टnewsबातम्या