शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रार्थनास्थळे उघडली तरी, गोंधळ नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 05:05 IST

Mandir will Open From Padava: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांबाबत घेतलेला निर्णय म्हणजे भाविकांसाठी दिवाळीची भेट आहे. सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने रविवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अखेर राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. सामान्य नागरिकांकडूनदेखील सरकारच्या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने धार्मिक स्थळे खुली केली असली तरीदेखील सर्व धार्मिक स्थळांच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांबाबत घेतलेला निर्णय म्हणजे भाविकांसाठी दिवाळीची भेट आहे. सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने रविवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आता जबाबदारी न्यासाची पण आहे. सगळ्या देवस्थानांची पण आहे. भाविकांची काळजी आणि सुरक्षा लक्षात घेता आता आम्ही एवढेच आवाहन करतो की, जेव्हा दर्शन सुरु होईल तेव्हा दर्शन कशा पध्दतीने करायचे आहे? याबाबत आम्ही रविवारी जाहीर करु. फक्त गर्दी करु नये. सावकाश दर्शनासाठी आपण सहकार्य केले तर व्यवस्थित दर्शन होईल. दर्शनाबरोबरच कोणत्याही पध्दतीचा गोंधळ, संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेणार आहोत. सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.- आदेश बांदेकर, अध्यक्ष, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समिती

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. मंदिरे कधी खुली होत आहेत? याची नागरिक वाट पाहत होते. प्रतीक्षा होती. कारण आपली मंदिरे आपली श्रद्धास्थाने आहेत. भारतीयांमध्ये मनोबल आणि आत्मबल वाढविण्याचे काम मंदिरांतून केले जाते. हे एक माध्यम आहे. खासकरून कोरोना काळात झालेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कोरोना संपलेला नाही. आपण सावधान राहिले पाहिजे. सतर्क राहिले पाहिजे. कोरोनाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. सामाजिक अंतर राखले गेले पाहिजे. मास्क घातले गेले पाहिजेत. अति उत्साह आणि गोंधळ नसावा. जेणेकरून कोरोना वाढेल.- आचार्य लोकेशजी, संस्थापक, अहिंसा विश्व भारती

धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे. आता सर्वसामान्यांनी धार्मिक स्थळांवर गेल्यावर नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच राज्यातील सर्व धार्मिक स्थळांच्या विश्वस्त तसेच सदस्यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये सुरक्षित अंतर राहील तसेच सर्व काळजी घेतली जाईल ही जबाबदारी घ्यावी. मंदिर, मशीद व चर्चमध्ये नागरिकांना वेळेचे नियोजन करून देणे गरजेचे आहे.- गॉडफ्रे पिमेंटा, उपाध्यक्ष, बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन

धार्मिक स्थळे खुली करण्याकरिता सरकारने उशीर केला आहे. हा निर्णय खूप आधी घ्यायला हवा होता. ज्याप्रमाणे रेल्वे आणि बसमध्ये सुरक्षित अंतर ठेवून प्रवास केला जात होता त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांवरमध्येदेखील नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवून प्रवेश दिला जाऊ शकत होता. सरकारने मंदिर, मशीद, चर्च खुले करण्याला विलंब केल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.- सलीम खान, सदस्य, गौसिया मशीद, धारावी

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेTempleमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या