शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी सरकारला धोका नाही; बच्चू कडूंनी मांडले गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 13:13 IST

दोन लोकांचे सरकार असलं तरी ते सक्षम आहेत. हे पहिल्यांदा होतंय असं नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबला हे मान्य आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू दिला नाही असं आमदार बच्चू कडू यांनीसां

अमरावती - नाना पटोलेंना माहिती नसावी. अपंगांना कमकुवत समजत असाल तर ते तुम्हाला कळाले नाहीत. दिव्यांग कमकुवत नाहीत. तुमच्यापेक्षा सक्षम आणि मजबूत आहेत. दिव्यांगांना कमकुवत समजण्याचं डोक्यातून काढून टाका. पॅरा ऑल्मपिकमध्ये सगळ्यात जास्त पदके दिव्यांगांनी आणली. नाना पटोलेंनी हे शब्द मागे घेतले पाहिजे. दिव्यांगांना कमकुवत समजत असाल तर त्याचा हिशोब आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

बच्चू कडू म्हणाले की, दोन लोकांचे सरकार असलं तरी ते सक्षम आहेत. हे पहिल्यांदा होतंय असं नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबला हे मान्य आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू दिला नाही. शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान दिले आहे. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार आहे. पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही. याबाबत जीआर आहे. अजितदादांना नियम आणि धोरणे माहिती आहे. त्यामुळे वेगळे काही मागणी करण्याची गरज नाही. ओला दुष्काळ कधी जाहीर करायचा याचे निकष आहेत. त्यानुसार तो जाहीर होईल. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना आहे. सध्या शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. सरकार मदत द्यायला तयार मग आंदोलनाची गरज कशाला, सरकारने मदत केली नसती तर सरकारविरोधात उभं राहू असंही बच्चू कडू म्हणाले. 

शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी...भीतीपोटी विस्तार होत नाही हे अत्यंत चुकीचे आहे. राज्यात आणि केंद्रात सरकार भाजपाचं मग भिती कुणाची? शिवसेनेचे ४० आमदार पुन्हा गेले तरी राज्यातील सरकार भाजपा आणि अपक्ष आमदारांचे मिळून बनते. त्यामुळे भीती हा विषय नाही. काही किंतुपरंतु असते. महाविकास आघाडीत दीड महिना ६ मंत्र्यांचे सरकार चालवले. मागचे दिवस विरोधकांनी पाहायला हवेत असा टोला बच्चू कडू यांनी विरोधकांना लगावला आहे. सरकार नव्याने आले आहे. न्यायालयीन बाब आहे. त्यात राज्यात अतिवृष्टी आहे त्यामुळे पहिलं प्राधान्य शेतकऱ्यांना दिले पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यापेक्षा विस्तार महत्त्वाचा आहे का? त्यामुळे विलंब होत असल्याचं बच्चू कडूंनी सांगितले.  

टॅग्स :BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेBacchu Kaduबच्चू कडू