शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
4
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
5
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
6
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
7
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
8
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
9
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
10
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
11
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
12
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
13
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
14
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
15
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
16
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
17
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
18
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
19
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी सरकारला धोका नाही; बच्चू कडूंनी मांडले गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 13:13 IST

दोन लोकांचे सरकार असलं तरी ते सक्षम आहेत. हे पहिल्यांदा होतंय असं नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबला हे मान्य आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू दिला नाही असं आमदार बच्चू कडू यांनीसां

अमरावती - नाना पटोलेंना माहिती नसावी. अपंगांना कमकुवत समजत असाल तर ते तुम्हाला कळाले नाहीत. दिव्यांग कमकुवत नाहीत. तुमच्यापेक्षा सक्षम आणि मजबूत आहेत. दिव्यांगांना कमकुवत समजण्याचं डोक्यातून काढून टाका. पॅरा ऑल्मपिकमध्ये सगळ्यात जास्त पदके दिव्यांगांनी आणली. नाना पटोलेंनी हे शब्द मागे घेतले पाहिजे. दिव्यांगांना कमकुवत समजत असाल तर त्याचा हिशोब आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

बच्चू कडू म्हणाले की, दोन लोकांचे सरकार असलं तरी ते सक्षम आहेत. हे पहिल्यांदा होतंय असं नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबला हे मान्य आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू दिला नाही. शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान दिले आहे. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार आहे. पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही. याबाबत जीआर आहे. अजितदादांना नियम आणि धोरणे माहिती आहे. त्यामुळे वेगळे काही मागणी करण्याची गरज नाही. ओला दुष्काळ कधी जाहीर करायचा याचे निकष आहेत. त्यानुसार तो जाहीर होईल. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना आहे. सध्या शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. सरकार मदत द्यायला तयार मग आंदोलनाची गरज कशाला, सरकारने मदत केली नसती तर सरकारविरोधात उभं राहू असंही बच्चू कडू म्हणाले. 

शिवसेनेचे ४० आमदार परतले तरी...भीतीपोटी विस्तार होत नाही हे अत्यंत चुकीचे आहे. राज्यात आणि केंद्रात सरकार भाजपाचं मग भिती कुणाची? शिवसेनेचे ४० आमदार पुन्हा गेले तरी राज्यातील सरकार भाजपा आणि अपक्ष आमदारांचे मिळून बनते. त्यामुळे भीती हा विषय नाही. काही किंतुपरंतु असते. महाविकास आघाडीत दीड महिना ६ मंत्र्यांचे सरकार चालवले. मागचे दिवस विरोधकांनी पाहायला हवेत असा टोला बच्चू कडू यांनी विरोधकांना लगावला आहे. सरकार नव्याने आले आहे. न्यायालयीन बाब आहे. त्यात राज्यात अतिवृष्टी आहे त्यामुळे पहिलं प्राधान्य शेतकऱ्यांना दिले पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यापेक्षा विस्तार महत्त्वाचा आहे का? त्यामुळे विलंब होत असल्याचं बच्चू कडूंनी सांगितले.  

टॅग्स :BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेBacchu Kaduबच्चू कडू