शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
4
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
5
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
6
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
7
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
8
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
9
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
10
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
11
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
12
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
13
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
14
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
15
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
16
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
17
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
18
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
19
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
20
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून एक रुपयाचीही मदत नाही; संभाजीराजे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 10:13 IST

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची ओल्या दुष्काळानं अक्षरशः वाट लावली.

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची ओल्या दुष्काळानं अक्षरशः वाट लावली. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातचं पीक वाया गेलं आहे. एवढं सगळं होऊनही केंद्रानं राज्यातील शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता घेतला होता. तोच धागा पकडत संभाजीराजेंनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. राज्यसभेमध्ये संभाजीराजेंनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत दिली जात नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. ट्विट करत त्यांनी सांगितलं की, विमा कंपन्यांची लूट व शेतकऱ्यांची परवड याविषयी संसदेत आवाज उठवला. कोल्हापूर - सांगली महापुराच्या नुकसान भरपाईचा आणि परतीच्या पावसाने खरिपाच्या नुकसान भरपाईचा एक रुपयाही अजून राज्याकडे पोहोचला नाही याचा जाब विचारून सरकारने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सभागृहात सांगितले. तसेच त्यांनी पूर्ण भाषणाचा व्हिडीओसुद्धा प्रसिद्ध केला आहे.  2016मध्ये पंतप्रधान पीकविमा योजना केंद्रानं सुरू केली असली तरी शेतकऱ्यांचा याचा फायदा पोहोचलेला नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करून विमा कंपन्यांनी आपलाच लाभ करून घेतला. शेतकऱ्यांनी केलेले नुकसानभरपाईचे दावेसुद्धा अनेक कंपन्यांनी धूळखात ठेवले. अशा पद्धतीनं विमा कंपन्यांकडून पैसे लाटण्याचा प्रकार असल्याचंही संभाजीराजे म्हणाले आहेत. ओल्या दुष्काळाच्या तीन महिन्यांनंतरही शेतकऱ्यांना मदतीचा एक पैसाही मिळालेला नाही,” अशी उद्विग्नताही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये महापूर आणि परतीच्या पावसाने हातचं पीक वाया गेलं, त्यामुळे मोठं नुकसान झालं. आकडेवारीनुसार 54 लाख हेक्टर सुपीक शेतजमिनीला परतीच्या पावसाचा फटका बसला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यानं केंद्राला दोन अहवाल पाठवूनसुद्धा केंद्रानं अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही. पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी राज्यानं सात हजार 702 कोटींची केंद्राकडे मागणी केली होती, पण यातील एक रुपयाही केंद्राकडून महाराष्ट्राला मिळालेला नाही, असंही संभाजीराजे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीFarmerशेतकरी