शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

साखरेपासूनही होणार इथेनॉल निर्मिती : १४५ लाख टन शिल्लकी साखरेचा प्रश्न मार्गी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 19:02 IST

देशात मोठ्या प्रमाणावर शिल्लकी साखर आहे...

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेला उठाव नसल्याने निर्यातीला मर्यादा केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्रीदर ३१०० रुपये प्रतिक्विंटल इतका

पुणे : केंद्र सरकारने साखरेपासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने देशातील तब्बल १४५ लाख टन शिल्लकी साखरेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कारखान्यांना या व्यवहारातून नफा मिळणार नसला तरी, पडून राहिलेल्या साखरेपोटी द्यावे लागणार व्याज आणि इतर खर्चातून सुटका होणार आहे. हा अप्रत्यक्ष नफाच असल्याचे मत राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने सी मोलॅसिस (मळी), बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर शिल्लकी साखर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेला उठाव नसल्याने निर्यातीला मर्यादा आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कारखाना महासंघाने साखरेपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्रीदर ३१०० रुपये प्रतिक्विंल इतका ठेवला आहे. त्यानुसारच मॉलॅसिसपासून तयार होणाºया इथेनॉलचा खरेदी दर ४३.७५, बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ५४.२७ आणि रसापासून तयार केलेल्या इथेनॉलचा खरेदीदर ५९.४८ रुपये असेल. मोलॅसिसपासून होणाऱ्या इथेनॉलमधे २९, बी हेवी मोलॅसिस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या १.८४ आणि उसाच्या रसापासून होणाऱ्या इथेनॉलदरात ३५ पैशांची वाढ झाली आहे.  साखर तयार करण्यासाठी कारखान्यांना काही ना काही खर्च करावा लागला आहे. साखरेपासून इथेनॉल करायचे म्हटल्यास त्यासाठी आठ ते साडेआठ रुपये प्रतिलिटर खर्च येईल. एक टन साखरेपासून ६०० लिटर इथेनॉल मिळेल. या सर्वबाबी पाहिल्यास कारखान्यांना फायदा होणार नाही. सध्या, देशातील ५३५ कारखान्यांच्या गोदामामधे १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. साखरेपासून इथेनॉल निर्मिती केल्यास साखरेत अडकलेली भांडवली गुंतवणूक मोकळी होऊ शकेल. तसेच, गोदामात साखर शिल्लक राहिल्यास त्यापोटी व्याजही कारखान्यांना भरावे लागले. हा कारखान्यांना मिळणारा अप्रत्यक्ष नफाच असल्याचे नाईकनवरे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसाय