शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

साखरेपासूनही होणार इथेनॉल निर्मिती : १४५ लाख टन शिल्लकी साखरेचा प्रश्न मार्गी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 19:02 IST

देशात मोठ्या प्रमाणावर शिल्लकी साखर आहे...

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेला उठाव नसल्याने निर्यातीला मर्यादा केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्रीदर ३१०० रुपये प्रतिक्विंटल इतका

पुणे : केंद्र सरकारने साखरेपासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने देशातील तब्बल १४५ लाख टन शिल्लकी साखरेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कारखान्यांना या व्यवहारातून नफा मिळणार नसला तरी, पडून राहिलेल्या साखरेपोटी द्यावे लागणार व्याज आणि इतर खर्चातून सुटका होणार आहे. हा अप्रत्यक्ष नफाच असल्याचे मत राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने सी मोलॅसिस (मळी), बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर शिल्लकी साखर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेला उठाव नसल्याने निर्यातीला मर्यादा आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कारखाना महासंघाने साखरेपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्रीदर ३१०० रुपये प्रतिक्विंल इतका ठेवला आहे. त्यानुसारच मॉलॅसिसपासून तयार होणाºया इथेनॉलचा खरेदी दर ४३.७५, बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ५४.२७ आणि रसापासून तयार केलेल्या इथेनॉलचा खरेदीदर ५९.४८ रुपये असेल. मोलॅसिसपासून होणाऱ्या इथेनॉलमधे २९, बी हेवी मोलॅसिस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या १.८४ आणि उसाच्या रसापासून होणाऱ्या इथेनॉलदरात ३५ पैशांची वाढ झाली आहे.  साखर तयार करण्यासाठी कारखान्यांना काही ना काही खर्च करावा लागला आहे. साखरेपासून इथेनॉल करायचे म्हटल्यास त्यासाठी आठ ते साडेआठ रुपये प्रतिलिटर खर्च येईल. एक टन साखरेपासून ६०० लिटर इथेनॉल मिळेल. या सर्वबाबी पाहिल्यास कारखान्यांना फायदा होणार नाही. सध्या, देशातील ५३५ कारखान्यांच्या गोदामामधे १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. साखरेपासून इथेनॉल निर्मिती केल्यास साखरेत अडकलेली भांडवली गुंतवणूक मोकळी होऊ शकेल. तसेच, गोदामात साखर शिल्लक राहिल्यास त्यापोटी व्याजही कारखान्यांना भरावे लागले. हा कारखान्यांना मिळणारा अप्रत्यक्ष नफाच असल्याचे नाईकनवरे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसाय