शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

आपत्कालीन मदत पथके स्थापन करा, सर्व महापालिकांना आदेश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 08:14 IST

आपत्कालीन विभागाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत जनतेला तातडीने मदत करता यावी यासाठी ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या आपत्कालीन मदत पथकाच्या (टीडीआरएफ) धर्तीवर राज्यातील सर्व महापालिकांनी पथके स्थापन करावीत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहावर आपत्कालीन विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित होते.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्कालीन यंत्रणा किती सज्ज आहे याचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. राज्य आपत्कालीन दलाची आठ पथके राज्यात आहेत, त्याची संख्या वाढवावी, तसेच विभागनिहाय राज्य आपत्कालीन पथके स्थापन करावीत, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

कुणाला कोणते आदेश?

  • उल्हास नदीवरील बदलापूर बॅरेज येथील ब्रिटिशकालीन पीअर्स हटवावा, जेणेकरून महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकण्यासारखी घटना पुन्हा घडणार नाही.
  • राज्यात ४८६ दरडप्रवण ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन कायमस्वरूपी व्यवस्था करावी. 
  • पावसाळ्यात ज्या भागांचा संपर्क तुटेल अशा ठिकाणी औषधी, पाणी आणि धान्य पुरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी.
  • राज्यातील सीमावर्ती भागात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मध्यप्रदेशातील संजय सरोवर, कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत त्या त्या राज्यांशी समन्वय ठेवावा.
  • वादळी वाऱ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ऊर्जा विभागाने दक्षता घ्यावी.
  • मुंबईतील रस्त्यांवरील मॅनहोलवर झाकणे आणि गर्डर बसवावेत.
टॅग्स :monsoonमोसमी पाऊसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार