शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

संभाजी ब्रिगेडचा इशारा; “मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अन्यथा…”

By प्रविण मरगळे | Updated: January 10, 2021 09:32 IST

OBC, Maratha Reservation News: घटनेच्या १५(४) व १६(४) या कलमांतर्गत १३ टक्के नोकऱ्यांमध्ये आणि १२ टक्के शिक्षणामध्ये असा महाराष्ट्रापुरता एसईबीसी हा वर्ग तयार करून मराठा समाजाला सवलती देण्यात आल्या.

ठळक मुद्देकोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाने जगाला आदर्श ठरतील असे ५८ मोर्चे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काढले.ईडब्ल्यूएस आरक्षण, एसईबीसी आरक्षण व ओबीसी आरक्षण यांचा एकमेकांशी काही संबंध नाही.ईडब्ल्यूएस आरक्षण हे ज्याला कुठलंच आरक्षण नसतं त्याला ते आपोआप लागू होत असतं.

मुंबई – मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून पुन्हा एकदा मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड आयोगाचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा आणि नाचीपनचा अहवाल स्वीकारून ओबीसीची टक्केवारी वाढवावी व सब कॅटेगिरी करून मराठा समाजाला वाढलेली टक्केवारी द्यावी. हा एकमेव संविधानिक मार्ग राज्य सरकारच्या अख्यारित असून हीच मागणी गेल्या ३० वर्षापासून आहे. परंतु राज्य सरकार वेगवेगळे असंवैधानिक पर्याय देऊन समाजाची दिशाभूल करीत आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे.

याबाबात संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे म्हणाले की, मराठा सेवा संघ ३३ कक्ष गेली तीस वर्ष मराठा आरक्षणाची भूमिका घेऊन महाराष्ट्र मध्ये काम करत आहेत. कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाने जगाला आदर्श ठरतील असे ५८ मोर्चे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काढले. मराठा समाजाच्या अनेक न्यायिक मागण्या या आंदोलनातून पुढे आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाची दीर्घकालीन सुरु असलेली आरक्षणाची मागणी जोर धरू लागली.. याचा विचार करत महाराष्ट्र सरकारने पहिला टप्पा म्हणून  काही सवलती मराठा समाजाला देण्यात आल्या. न्यायमूर्ती एम. जी.गायकवाड आयोग यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले व त्यात महाराष्ट्रातील मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्याच आधारे घटनेच्या १५(४) व १६(४) या कलमांतर्गत १३ टक्के नोकऱ्यांमध्ये आणि १२ टक्के शिक्षणामध्ये असा महाराष्ट्रापुरता एसईबीसी हा वर्ग तयार करून मराठा समाजाला सवलती देण्यात आल्या. काही दिवस या सवलती सुरू राहिल्या, सर्वोच्च न्यायालयात त्यास अंतरिम स्थगिती दिली असं त्यांनी सांगितले.

ओबीसी समावेशासाठी लढा उभा करणार

संभाजी ब्रिगेडने केलेली मागणी न्यायिक, संवैधानिक असून येथून पुढे ओबीसी समावेशासाठी लढा उभा केला जाणार आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण, एसईबीसी आरक्षण व ओबीसी आरक्षण यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. तरीसुद्धा राज्य सरकार वेगवेगळे पत्र काढून ईडब्ल्यूएस मराठा समाजाला लागू होणार नाही अशा पद्धतीने दिशाभूल करीत आहे.  ईडब्ल्यूएस आरक्षण हे ज्याला कुठलंच आरक्षण नसतं त्याला ते आपोआप लागू होत असतं. असे असतानासुद्धा सरास समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम सरकार करीत आहे. वेगवेगळ्या भरती आणि परीक्षेची घोषणा करून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे कामही राज्य सरकार करीत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय कुठलीही भरती किंवा कुठलीही परीक्षा सरकारने घेऊ नये. या मागण्यांसाठी संभाजी ब्रिग्रेड महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढवेल आणि राज्यभर लढा उभारला  जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या मागण्या काय?

  • न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड आयोगाच्या शिफारशी स्वीकारून त्याआधारे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा व आत्ता ओबीसीमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळे वर्ग आहेत. ( NT A B C D, VJ, SBC ) तशीच एक सबकॅटेगरी तयार करून मराठ्यांना आरक्षण द्यावे आणि त्यानंतर ओबीसीची टक्केवारी वाढवण्यासाठी नचिपन समितीचा अहवाल स्वीकारावा. ही प्रमुख मागणी संभाजी ब्रिगेड अनेक वर्ष करत आहे तसे लेखी पत्र अनेक वेळा वेगवेगळ्या आयोगांना व मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहे. ह्या मार्गाने गेल्यास मराठ्यांच आरक्षण टिकणार आहे.
  • मराठवाडा वगळता इतर विभागांमध्ये काही काळ मागे जाऊन पाहिले  (आजोबा-पणजोबा) तर कुणबी नोंदी मराठा समाजाच्या सापडतात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने या प्रकारचे दाखले न देण्याचे अलिखित घोषणा व सूचना दिलेल्या आहेत.. हे दाखले देण्यासाठी महाराष्ट्र शासनवर दबाव वाढवणार आहे.
  • आरक्षणाच्या दृष्टीने देशभरात अत्यंत महत्त्वाच्या जातनिहाय जनगणना करण्यासाठी व नाचीपन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी सर्वाना एकत्रित करून प्रयत्न करणार आहे.
टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडUddhav Thackerayउद्धव ठाकरे