शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

येत्या दोन वर्षांत सीएनजीचा विस्तार करणार - धर्मेंद्र प्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 21:50 IST

जगात इंधनयुक्त वायूचा वापर हा २४ टक्के होतो, तर भारतात हे प्रमाण ६ टक्के आहे.

ऑनलाइन लोकमत/मनोहर कुंभेजकर

मुंबई, दि. 1 - जगात इंधनयुक्त वायूचा वापर हा २४ टक्के होतो, तर भारतात हे प्रमाण ६ टक्के आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त आणि स्वस्त असलेल्या सीएनजीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने पुढाकार घ्यावा. आजही अनेक मुंबईकराकडे एलपीजी गॅस सिलिंडर नाही. त्यामुळे येत्या दोन वर्षांत मुंबईसह देशात सीएनजी आणि एलपीजीचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पावभाजीच्या गाडीवर सीएनजीयुक्त पावभाजी मिळेल, असा फलक पावभाजी गाडीवाला अभिमानाने सांगेल, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) धर्मेंद्र प्रधान यांनी आज बीकेसी येथे केले. मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर ७०० किमी नैसर्गिक वायूयुक्त पाईपलाईन टाकण्यात येणार असल्यामुळे येथे विकसित होणाऱ्या शहरांचा विकास आणि रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पर्यावरण स्नेहीइंधनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)ने मेसर्स इको फ्युएल (लोवाटो, इटलीचे भारतीय भागीदार) यांच्या भागीदारीतून सीएनजी इंधनयुक्त दुचाकी बाजारात आणल्या आहेत. सीएनजी इंधनयुक्त दुचाकीचे बीकेसीतील महानगर गॅस लिमिटेड कार्यालयासमोर अनावरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, स्थानिक खासदार पूनम महाजन, एमजीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. सी. त्रिपाठी, एमजीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव माथूर, संचालक राजेश पांडे, मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष सुहास अडिवडेकर, मुंबई भाजपा सरचिटणीस अमरजित मिश्रा, शिवप्रसाद भिडे, अमरजीत सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर २५ सीएनजी किटयुक्त लोवोटा दुचाकी स्कूटींना त्यांनी झेंडा दाखवला. धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की, या सीएनजीयुक्त दुचाकीचा फायदा मुंबई महानगर प्रदेशातील ३६ लाखांपेक्षा जास्त दुचाकी वाहनांना होऊ शकेल. या महानगरातील सीएनजीच्या वाहनांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. खासदार पूनम महाजन यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सीएनजी किट बसवलेल्या दुचाकी वाहनधारकाना काही सूट देता येईल का, याचा विचार एमजीएलने व गेलने करावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली.शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, दिल्लीनंतर मुंबई उपनगरात हा वेगळा उपक्रमाची भर पडली आहे. जे विद्यार्थी अशा ग्रीन एनर्जी प्रणालीचा वापर आपल्या दुचाकी वाहनांमध्ये करतील त्या पर्यावरण रक्षक विद्यार्थ्याना अंतिम परीक्षेत जास्त गुण देण्याचा शिक्षण विभाग निश्चित विचार करेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षेत देखील या वाढीव गुणांचा त्यांना फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही प्रणाली किफायतशीर आणि स्वस्त असून, पेट्रोलला एका लिटरसाठी १.२० पैसे खर्च तर वायूवर आधारित या इंधनाच्या एका लिटरसाठी ६० पैसे खर्च येतो. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या या प्रणालीचा प्रसार मुंबईसह महाराष्ट्रात होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक प्रदीप भिडे यांनी केले. असे आहे दुचाकी किट या किटमध्ये प्रत्येकी १.२ लिटरचे सीएनजी सिलिंडर असून, सुमारे ०.६० रुपये प्रति किमी प्रत्येकी भरण्यावर सुमारे १२० ते १३० किमी दुचाकी वाहन चालू शकते.