शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले’’ पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 20:48 IST

Prithviraj Chavan Criticize BJP Government: कोल्हापूर ते पुणे महामार्गावर पडलेले खड्डे आणि वाहनांकडून वारेमाप प्रमाणात आकारण्यात येत असलेल्या टोलविरोधात काँग्रेसने आज ठिकठिकाणी व्यापक आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि सरकारवर गंभीर आरोप केले.

मुंबई - कोल्हापूर ते पुणे महामार्गावर पडलेले खड्डे आणि वाहनांकडून वारेमाप प्रमाणात आकारण्यात येत असलेल्या टोलविरोधात काँग्रेसने आज ठिकठिकाणी व्यापक आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि सरकारवर गंभीर आरोप केले. भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आनेवाडी तासवडे या सातारा जिल्ह्यातील दोन टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, खड्डेयुक्त महामार्ग असताना केंद्र सरकारने दोन दोन ठेकेदारांना ठेका दिलेला आहे. हा जनतेचा पैसा आहे. मोदी गडकरींच्या खिशातील पैसा आहे का? असा संतप्त सवाल केला. अदानी आणि रिलायन्सला महामार्गाच्या कामाचा काय अनुभव आहे म्हणून त्यांना ठेका दिला आहे. गेल्या वर्षांपासून प्रवाशांची परवड सुरू असून,  महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. १५-२० टक्के कमिशन घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने ठेका देण्याची प्रथा मोदींनी सुरू केली आहे. महामार्गाचे उप ठेका डी.पी. जैन यांना दिला असून,  गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे हजार कामगारांचे पगार झालेले नाहीत. यामुळेच कामाला गती मिळत नसून याचा नाहक त्रास जनतेला भोगावा लागत आहे. 

तर पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुणे सातारा महामार्गाची दुरवस्था झाल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत तरिही टोल वसुली केली जात आहे. ८ दिवसाच्या आता खड्डे बुजवण्याची मागणी यावेळी करण्यात महामार्ग प्राधिकरणाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 

दरम्यान, कोल्हापूर ते पुणे महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत टोल माफी करण्यात यावी, ही मागणी घेऊन काँग्रेस पक्षाच्यावतीने आज टोल नाक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कोल्हापूरहून पुणे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील किणी, तासवडे, आनेवाडी आणि खेड शिवापुर या चारही टोल नाक्याच्या ठिकाणी काँग्रेसने एकाचवेळी आंदोलन केले. टोलमाफी वरून काँग्रेसने पुकारलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा रस्ता जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत २५% टोल सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय २० किलोमीटर परिसरातील गावातील वाहनधारकांना टोल माफी असणार आहे. तर ५० टक्के टोल सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या एक महिन्याच्या आत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtraमहाराष्ट्रhighwayमहामार्ग