शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

"महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले’’ पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 20:48 IST

Prithviraj Chavan Criticize BJP Government: कोल्हापूर ते पुणे महामार्गावर पडलेले खड्डे आणि वाहनांकडून वारेमाप प्रमाणात आकारण्यात येत असलेल्या टोलविरोधात काँग्रेसने आज ठिकठिकाणी व्यापक आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि सरकारवर गंभीर आरोप केले.

मुंबई - कोल्हापूर ते पुणे महामार्गावर पडलेले खड्डे आणि वाहनांकडून वारेमाप प्रमाणात आकारण्यात येत असलेल्या टोलविरोधात काँग्रेसने आज ठिकठिकाणी व्यापक आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि सरकारवर गंभीर आरोप केले. भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आनेवाडी तासवडे या सातारा जिल्ह्यातील दोन टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, खड्डेयुक्त महामार्ग असताना केंद्र सरकारने दोन दोन ठेकेदारांना ठेका दिलेला आहे. हा जनतेचा पैसा आहे. मोदी गडकरींच्या खिशातील पैसा आहे का? असा संतप्त सवाल केला. अदानी आणि रिलायन्सला महामार्गाच्या कामाचा काय अनुभव आहे म्हणून त्यांना ठेका दिला आहे. गेल्या वर्षांपासून प्रवाशांची परवड सुरू असून,  महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. १५-२० टक्के कमिशन घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने ठेका देण्याची प्रथा मोदींनी सुरू केली आहे. महामार्गाचे उप ठेका डी.पी. जैन यांना दिला असून,  गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे हजार कामगारांचे पगार झालेले नाहीत. यामुळेच कामाला गती मिळत नसून याचा नाहक त्रास जनतेला भोगावा लागत आहे. 

तर पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुणे सातारा महामार्गाची दुरवस्था झाल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत तरिही टोल वसुली केली जात आहे. ८ दिवसाच्या आता खड्डे बुजवण्याची मागणी यावेळी करण्यात महामार्ग प्राधिकरणाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 

दरम्यान, कोल्हापूर ते पुणे महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत टोल माफी करण्यात यावी, ही मागणी घेऊन काँग्रेस पक्षाच्यावतीने आज टोल नाक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कोल्हापूरहून पुणे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील किणी, तासवडे, आनेवाडी आणि खेड शिवापुर या चारही टोल नाक्याच्या ठिकाणी काँग्रेसने एकाचवेळी आंदोलन केले. टोलमाफी वरून काँग्रेसने पुकारलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा रस्ता जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत २५% टोल सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय २० किलोमीटर परिसरातील गावातील वाहनधारकांना टोल माफी असणार आहे. तर ५० टक्के टोल सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या एक महिन्याच्या आत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtraमहाराष्ट्रhighwayमहामार्ग