शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

आणीबाणीसाठी एल्गारच्या नेत्यांना अटक, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 06:06 IST

हिंदू-मुस्लीम समाजात दंगली घडवण्यात अपयश आल्याने आरक्षणवादी व आरक्षणविरोधी गटांत सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मुंबई : हिंदू-मुस्लीम समाजात दंगली घडवण्यात अपयश आल्याने आरक्षणवादी व आरक्षणविरोधी गटांत सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एल्गार परिषदेच्या नेत्यांना होणाऱ्या अटकेसंदर्भात खुलासा करण्यासाठी आंबेडकर यांनी पक्ष कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात सरकारकडून देशात दंगली घडवून अराजकता माजवत आणीबाणी आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.आंबेडकर म्हणाले की, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक केली जात आहे. मुळात एकबोटे आणि भिडे यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे कारण देत क्लीन चिट देणाºया सरकारने एल्गार परिषदेच्या नेत्यांविरोधात कोणते पुरावे मिळाले, ते सादर करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा दंगलीशी काय संबंध आहे? त्याचा खुलासाही सरकारने करण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.मुळात देशभरातील पोटनिवडणुकांसह विधानसभेच्या काही निवडणुकांत सरकारविरोधात जनमत जात असल्याचे दिसत आहे. म्हणूनच निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सरकारकडून सातत्याने दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्यात अपयश आल्याने आता सरकार आरक्षणवादी व आरक्षणविरोधी गटांत दंगली घडवू पाहत आहे. जेणेकरून देशात अराजकता माजून आणीबाणी घोषित करता येईल. एकदा आणीबाणी घोषित झाली की निवडणुका मे महिन्यापर्यंत पुढे ढकलता येतील, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा दंगल किंवा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही. मात्र तपास यंत्रणांनी कोणत्याही पुराव्यांअभावी तथाकथित पत्रांचा संदर्भ माओवाद्यांशी जोडला आहे. मुळात एल्गार परिषदेच्या नेत्यांकडून जमा केलेल्या लॅपटॉपमधील डाटाही माओवादी किंवा नक्षलवाद्यांकडून आल्याचा पुरावा तपास यंत्रणांकडे नाही. तरीही परिषदेच्या नेत्यांना अडकवण्याचा डाव तपास यंत्रणांनी आखल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.भिडे यांना नोटीस बजावणारनाशिक : आंबे खाल्ल्याने मूल होण्याचा दावा करणाºया शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांना महापालिकेच्या वतीने कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार आहे. नाशिकमधील विधानाबाबतची ध्वनिचित्रफीतदेखील तपासली जाणार आहे.संभाजी भिडे यांची रविवारी वडांगळीकर मठात सभा झाली. तेव्हा त्यांनी उपरोक्त विधान केले. त्याबाबत तक्रार केल्यानंतर पुणे येथील आरोग्य सेवा संचालकांनी चौकशी करून कार्यवाही करण्याची व अहवाल देण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत कायदेशीर नोटीसच बजावली जाणार आहे. भिडे यांच्या दाव्यातील सत्यता पडताळल्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव गर्भजल परीक्षा प्रतिबंधक समितीसमोर ठेवण्यात येणार असून, ही समितीच भिडे यांचे उत्तर आणि पुरावे याबाबत तपासणी करून योग्य तो निर्णय घेईल, असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.विस्थापितांना मिळणार महापालिकेची सदनिकाकोरेगाव भीमा दंगलीत बेघर झालेल्या दोन कुटुंबांचे पुनर्वसन महापालिकेच्या मालकीच्या सदनिकांमध्ये करण्यात आले. अशोक आठवले व सुरेश सकट अशी सदनिका मिळालेल्यांची नावे आहेत. ही दोन्ही कुटुंबे १ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून बसली होती.पालिकेच्या चाळ विभागाकडील कसबा पेठेतील कॉलनी क्रमांक ५ मधील दोन सदनिका या कुटुंबाना देण्यात आल्या आहेत. त्या ११ महिन्यांकरिता असून, त्यांच्याकडून प्रति महिना १ रूपया भाडे आकारले जाणार आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBhima-koregaonभीमा-कोरेगावnewsबातम्या