शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

अकरावी प्रवेशाचा खेळखंडोबा

By admin | Updated: August 24, 2016 01:43 IST

अकरावीला घरापासून नजीकच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालकही हट्टाला पेटले आहेत.

मुंबई : अकरावीला घरापासून नजीकच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालकही हट्टाला पेटले आहेत. त्यामुळेच अकरावीच्या पहिल्या टप्प्यातील आॅनलाइन प्रवेशानंतर महाविद्यालय बदलासाठी सलग दोन विशेष फेऱ्यांसाठी २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. मात्र या सर्व प्रक्रियांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.यंदा प्रथमच अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. कारण उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अकरावीचे १०० टक्के प्रवेश हे आॅनलाइन पद्धतीनेच करावे लागणार आहेत. मात्र एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, म्हणून प्रशासनाने दोन महिन्यांपासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे. शिक्षण व्यवस्थेतील एका महत्त्वाच्या बदलाला सकारात्मकतेने घेण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाऊ करून पालक या प्रक्रियेविरोधात उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. उलट आॅफलाइनच्या निमित्ताने होणाऱ्या भ्रष्टाचाराला चाप लावत पारदर्शक प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला शिक्षणतज्ज्ञांनीही पसंती दर्शवली आहे. प्रवेश बदलाच्या खेळात पालकही सामील होत असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी हजारो रुपये खर्चून आॅफलाइन प्रवेशाची मागणीही काही पालकांनी केली आहे. मात्र हाच भ्रष्टाचार रोखून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेशाची समान संधी देण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)> अजूनही महाविद्यालयांबाहेर बेटरमेंटसाठी विद्यार्थी आणि पालकांच्या रांगा लागत आहेत. महाविद्यालय निवडीचा हट्ट धरताना प्रवेशासाठी किती वेळ वाया जात आहे, याचा विचार पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा.- टी.पी. घुले, प्राचार्य, महर्षी दयानंद महाविद्यालय