वीज पडून २ महिला ठार

By Admin | Updated: August 21, 2014 22:19 IST2014-08-21T20:37:38+5:302014-08-21T22:19:27+5:30

उकळी व हिवरासाबळे येथील घटना : चार गंभीर जखमी

Electricity killed 2 women killed | वीज पडून २ महिला ठार

वीज पडून २ महिला ठार

मेहकर : तालुक्यातील उकळी व हिवरा साबळे शिवारात वीज पडून शेतात काम करीत असलेल्या दोन महिला ठार व चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील अनेक गावात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. उकळी शिवारात मोहन बोरे यांच्या शेतात काम करीत असलेल्या महिला पाऊस आल्याने निंबाच्या झाडाखाली गेल्या. या दरम्यान झाडावर विज पडली त्यामध्ये उकळी येथील सोनु शिवाजी अवदगे (२0) ही महिला ठार झाली. तर सुरेखा रामप्रसाद खोडवे ही गंभीर जखमी झाली आहे. तसेच याच शिवारात स्वत:च्या शेतात काम करीत असतांना विज पडून सुमित्रा अर्जून बोरे (५५) ही गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील हिवरा साबळे येथील ज्ञानेश्‍वर सखाराम गायकवाड (२५), प्रदिप सुभाष वाघ (२५) व सुवर्णा ज्ञानेश्‍वर गायवाकड यांच्या अंगावरही विज पडल्याने हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मेहकर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार निर्भय जैन यांनी घटनास्थळी जावून भेट घेतली.

Web Title: Electricity killed 2 women killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.