शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मंत्रिमंडळ बैठकीत बत्ती गुल; मुख्यमंत्र्यांचा व्हीसीद्वारे संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 06:29 IST

मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात दुपारी ४ वाजता सुरू झाली. मुख्यमंत्री ऑनलाइन सहभागी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीला ‘बत्ती गुल’चा फटका बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. तथापि, वीज गेल्याने त्यांचा संपर्क तुटला व नंतर ते बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत.

मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात दुपारी ४ वाजता सुरू झाली. मुख्यमंत्री ऑनलाइन सहभागी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री मंत्रालयातील सातव्या माळ्यावरील सभागृहात बैठकीसाठी बसलेले होते. चर्चेअंती एकेक निर्णयास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ५.३० च्या सुमारास अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले आणि ओबीसी आरक्षणाबद्दल मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू झाली. पंधरा-वीस मिनिटे झाली असताना अचानक वीज गेली. लगेच इन्व्हर्टरवर माईक व यंत्रणा सुरू झाली पण,तोवर मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटला होता. दहा मिनिटे प्रयत्न करूनही तो पुन्हा स्थापित होऊ शकला नाही.

२३,४०० मेगावॅट विजेची मागणी n उन्हाच्या तडाख्यामुळे विजेची मागणी वाढत असून,  राज्यात बुधवारी २३ हजार ४०० मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदविण्यात आली. आणि त्या तुलनेत पुरवठा देखील तेवढाच करण्यात आला, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. n राज्यात बुधवारी कोठेही भारनियमन करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, गेल्या २० दिवसांपासून कोणत्याही वाहिनीवर विजेचे भारनियमन झालेले नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे