मुख्यालयात विजेची उधळपट्टी
By Admin | Updated: July 22, 2014 01:21 IST2014-07-22T01:21:50+5:302014-07-22T01:21:50+5:30
महापालिकेच्या मुख्यालयास मॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याठिकाणी विजेची उधळपट्टी सुरू आहे.

मुख्यालयात विजेची उधळपट्टी
नामदेव मोरे - नवी मुंबई
महापालिकेच्या मुख्यालयास मॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याठिकाणी विजेची उधळपट्टी सुरू आहे. 3 महिन्यांत तब्बल 71 लाख 5क् हजार रूपये वीज बिल आले असून वातानुकूलित यंत्रणोच्या अट्टहासासाठी जनतेचा पैसा फुकट जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय शहरातील लँडमार्क म्हणून ओळखले जावू लागले आहे. इमारत दिसायला अत्यंत आकर्षक असली तरी प्रशासकीय कामकाजासाठी मात्र गैरसोयीची होऊ लागली आहे. जनतेने कररूपाने दिलेल्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. सेंट्रल एसी बसविण्यात आल्याने येथे आले की मॉलमध्ये आल्याचा भास होत आहे. वातानुकूलित यंत्रणोच्या या अट्टाहासामुळे विजेचे बिल लाखांच्या घरात जात आहे. जुन्या मुख्यालयात महिन्याला दोन ते अडीच लाख रूपये बिल येत होते. परंतु नवीन मुख्यालयामध्ये एप्रिल महिन्यात 3क् लाख, मेमध्ये 14 लाख व जूनमध्ये तब्बल 27 लाख 5क् हजार रूपये वीज बिल आले आहे. 8क् टक्के वीज वातानुकूलित यंत्रणोवर खर्च होत आहे.
जुन्या मुख्यालयात वर्षाला जवळपास 25 लाख रूपये वीजबिलावर खर्च होत होते. नवीन मुख्यालयात तो खर्च महिन्याला होत आहे. तीन महिन्यांत तब्बल 71 लाख रूपये बिल आल्यामुळे सर्वाचे डोळे विस्फारले आहेत. वास्तविक सरकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये कमी जागेचा जास्तीतजास्त वापर होणो आवश्यक असते. वीज, पाणी सर्वाचीच बचत करणो आवश्यक आहे. हजारो कोटी रूपयांचा बँक बलन्स असणारी सिडको, मिनी मंत्रलय असणारे कोकणभवन येथे कार्यालयांमध्ये पुरेसा नैसर्गिक प्रकाश येईल याची काळजी घेतली आहे. परंतु पालिकेने मात्र सूर्यप्रकाश इमारतीमध्ये येईल अशी सोयच केलेली नाही. मॉलप्रमाणो बांधकाम केल्यामुळे देखभालीवर महिन्याला जनतेने कररूपाने जमा केलेले लाखो रूपये फुकट जात आहेत.
नियोजन चुकले
इमारतीचे बांधकाम करताना पुरेसा सूर्यप्रकाश इमारतीमध्ये येईल याची काळजी घेण्यात आलेली नाही. भिंतीच्या बाजूला अधिकारी व पदाधिका:यांची दालने तयार केली आहेत. यामुळे कर्मचारी जिथे बसतात तेथे वीजपुरवठय़ाशिवाय प्रकाशच येवू शकत नाही अशी स्थिती आहे. वातानुकूलित यंत्रणोची कर्मचा:यांना उबग आली असून अनेकजण मोकळा श्वास घेता यावा यासाठी कार्यालयाबाहेर फेरफटका मारत आहेत.
मुख्यालयात विजेची बचत करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. मोकळ्या जागेमध्ये वातानुकूलित यंत्र बंद करण्यात येत आहे. इमारतीमधील झुंबरातील बल्बही बंद ठेवले आहेत. जिथे शक्य आहे तेथे विजेचा वापर कमी करण्यात येत आहे.
- जी. व्ही. राव, सहशहर अभियंता, महापालिका
जनतेर्पयत
चुकीचा संदेश
शहरात पाणी, वीज जपून वापरण्याचे आवाहन करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणो आवश्यक आहे. परंतु पालिकेने मुख्यालयात विजेची उधळपट्टी सुरू केली असून त्यामुळे जनतेर्पयत चुकीचा संदेश जात आहे.