शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
3
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
4
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
5
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
6
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
7
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
8
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
10
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
11
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
12
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
13
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
14
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
15
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
16
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
17
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
18
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
19
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
20
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने, दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 10:37 IST

Mahavikas Aghadi Government : विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड आवाजी मतदानाने करण्यात येणार आहे. आतापर्यंत गुप्त मतदानाद्वारे होणारी ही निवड आवाजी मतदानाने करण्याची नवी रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे.

मुंबई : विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड आवाजी मतदानाने करण्यात येणार आहे. आतापर्यंत गुप्त मतदानाद्वारे होणारी ही निवड आवाजी मतदानाने करण्याची नवी रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.पटोेले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा गेल्या फेब्रुवारीत दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. काँग्रेसच्या कोट्यात असलेले पद ११ महिन्यांपासून भरता आलेले नाही. अध्यक्षपदाच्या निवडीत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून निवड आवाजी मतदानाने केली जाईल. या संबंधीचे विधेयक विधिमंडळाच्या २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आणून ते मंजूर केले जाईल व नंतर अधिवेशनातच अध्यक्षपदाची निवड घेतली जाईल. महाविकास आघाडी सरकारकडे १७० सदस्यांचे संख्याबळ विधानसभेत आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार निवडून देण्यात कुठलीही अडचण नाही. त्यातच भाजपचे १२ सदस्य निलंबित आहेत. त्यात गिरीश महाजन, जयकुमार रावल, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, योगेश सागर, नारायण कुचे, अतुल भातखळकर, हरिश पिंपळे, पराग अळवणी, राम सातपुते, अभिमन्यू पवार, कीर्तीकुमार भांगडिया यांचा समावेश आहे. तरीही कुठलीही जोखीम नको म्हणून विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.  विधानसभा नियम समितीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत या संबंधीचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. आता विधानसभेत ठराव मांडून नियमात सुधारणा केली जाईल. समितीच्या बैठकीत भाजपचे डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला गेल्या फेब्रुवारीमध्ये एक पत्र लिहून मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड करा, असे सांगितले होते. मात्र तरीही निवड झाली नाही.  

विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदानाने केली जाईल. त्यासाठीचे सुधारणा विधेयक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणू. इतर काही राज्यांमध्येदेखील हीच पद्धत आहे. त्यात गैर काहीही नाही.     - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने करणे म्हणजे नियमांना तिलांजली देवून मनमानी सुरू असल्याचे लक्षण आहे. संपूर्ण बहुमताचा दावा करणारे लोकशाहीचा खून करायला निघाले आहेत. यातच तीन पक्षांमध्ये परस्पर किती अविश्वासाचे वातावरण आहे हे सिद्ध होते.        - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता, विधानसभा

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार