शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने, दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 10:37 IST

Mahavikas Aghadi Government : विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड आवाजी मतदानाने करण्यात येणार आहे. आतापर्यंत गुप्त मतदानाद्वारे होणारी ही निवड आवाजी मतदानाने करण्याची नवी रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे.

मुंबई : विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड आवाजी मतदानाने करण्यात येणार आहे. आतापर्यंत गुप्त मतदानाद्वारे होणारी ही निवड आवाजी मतदानाने करण्याची नवी रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.पटोेले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा गेल्या फेब्रुवारीत दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. काँग्रेसच्या कोट्यात असलेले पद ११ महिन्यांपासून भरता आलेले नाही. अध्यक्षपदाच्या निवडीत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून निवड आवाजी मतदानाने केली जाईल. या संबंधीचे विधेयक विधिमंडळाच्या २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आणून ते मंजूर केले जाईल व नंतर अधिवेशनातच अध्यक्षपदाची निवड घेतली जाईल. महाविकास आघाडी सरकारकडे १७० सदस्यांचे संख्याबळ विधानसभेत आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार निवडून देण्यात कुठलीही अडचण नाही. त्यातच भाजपचे १२ सदस्य निलंबित आहेत. त्यात गिरीश महाजन, जयकुमार रावल, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, योगेश सागर, नारायण कुचे, अतुल भातखळकर, हरिश पिंपळे, पराग अळवणी, राम सातपुते, अभिमन्यू पवार, कीर्तीकुमार भांगडिया यांचा समावेश आहे. तरीही कुठलीही जोखीम नको म्हणून विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.  विधानसभा नियम समितीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत या संबंधीचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. आता विधानसभेत ठराव मांडून नियमात सुधारणा केली जाईल. समितीच्या बैठकीत भाजपचे डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला गेल्या फेब्रुवारीमध्ये एक पत्र लिहून मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड करा, असे सांगितले होते. मात्र तरीही निवड झाली नाही.  

विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदानाने केली जाईल. त्यासाठीचे सुधारणा विधेयक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणू. इतर काही राज्यांमध्येदेखील हीच पद्धत आहे. त्यात गैर काहीही नाही.     - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने करणे म्हणजे नियमांना तिलांजली देवून मनमानी सुरू असल्याचे लक्षण आहे. संपूर्ण बहुमताचा दावा करणारे लोकशाहीचा खून करायला निघाले आहेत. यातच तीन पक्षांमध्ये परस्पर किती अविश्वासाचे वातावरण आहे हे सिद्ध होते.        - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता, विधानसभा

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार