शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

विधानसभा अध्यक्षांची निवड : राज्यपालांचा ‘तो’ अधिकार केवळ पहिल्या विधिमंडळ अधिवेशनापुरताच

By यदू जोशी | Published: February 19, 2021 4:37 AM

Governor : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळ सचिवालयाला एक पत्र पाठविले असून, रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक १ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावी, असे त्यात म्हटले आहे.

- यदु जोशी

मुंबई :  नव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन बोलावताना राज्यपाल अध्यक्षांची निवड अमुक दिवशी व्हावी, असे सांगू शकतात. परंतु, त्यानंतर कोणत्याही कारणाने ते पद रिक्त झाल्यास ते भरण्यासाठी निवडणूक केव्हा घ्यायची, हा पूर्णपणे सभागृहाच्या अखत्यारीतील विषय आहे. राज्यपाल ही निवडणूक घेण्याबाबत सरकारला केवळ संदेश पाठवू शकतात,  ते ऐकणे विधानसभेवर व सरकारवर बिलकूल बंधनकारक नाही. घटनात्मक तरतुदी बघता ही माहिती समोर आली.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळ सचिवालयाला एक पत्र पाठविले असून, रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक १ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावी, असे त्यात म्हटले आहे.संविधानाचा अनुच्छेद १७८ हा  विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीसंबंधीचा आहे. त्यात फक्त एवढेच म्हटले आहे की, प्रत्येक राज्याच्या विधानसभेने आपल्यापैकी दोन सदस्यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड करावी. यासाठी ‘शक्यतो लवकर’ असा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे. ही तरतूद मुख्यत: निवडणुकीनंतर अस्तित्वात येणाऱ्या  नव्या विधानसभेसंबंधी आहे. नव्या विधानसभेच्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपालांकडून नेमले जाणारे हंगामी अध्यक्ष (प्रो-टेम स्पीकर) फक्त तेवढ्याच कामासाठी असतात. त्यामुळे सदस्यांचा शपथविधी होऊन नवी विधानसभा रीतसर अस्तित्वात आल्यावर त्या सभागृहाला कायमस्वरूपी अध्यक्ष व उपाध्यक्ष निरंतर स्वरूपात असावेत, हा त्यामागचा हेतू आहे. 

दोन्ही पदे रिक्त असतील तर राज्यपालांची भूमिका -अध्यक्ष नसल्यास उपाध्यक्ष त्यांचे काम करू शकतात. परंतु, अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही नसल्यास सभागृहाचे कामकाज चालू शकत नाही. - कदाचित म्हणूनच सभागृह नव्याने अस्तित्वात आल्यावर अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीच्या संदर्भात शक्यतो लवकर, असा शब्दप्रयोग केला गेला असावा. दोन्ही पदे रिक्त असतील तर अध्यक्षांची नियुक्ती राज्यपाल करू शकतात.

संवैधानिक बंधन नाही नाना पटोले यांनी अध्यक्षपद सोडले, त्याला अद्याप १५ दिवसही झालेले नाहीत. राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन १ मार्चपासून मुंबईत बोलावले आहे. त्याच अधिवेशनात नवा अध्यक्ष निवडलाच पाहिजे, असे कोणतेही संवैधानिक बंधन नाही. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ पदावर असल्याने रीतसर अध्यक्ष नसतानाही विधानसभेचे अधिवेशन होऊ शकते. अध्यक्षांचे पद रिकामे असताना त्यांचे सर्व अधिकार उपाध्यक्षांकडे येतात. रिक्ततेच्या पूर्ततेविषयी संविधान काहीही सांगत नाही.

तुमचा आपल्याच आमदारांवर विश्वास नाही का? : फडणवीसविधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यासाठी सरकार मागे-पुढे का पाहते, सरकारचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आपल्याच आमदारांना घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पाहत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी