शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

पत्नीची छेड काढणा-या तरुणाची निर्घृण हत्या, औरंगाबादमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 21:18 IST

पत्नीची छेड काढल्याच्या कारणावरुन 19 वर्षीय तरुणाला घराबाहेर बोलावून नेत त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची थरारक घटना

ठळक मुद्देपत्नीची छेड काढल्याच्या कारणावरुन 19 वर्षीय तरुणाला घराबाहेर बोलावून नेत त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची थरारक घटना हत्या करून पसार झालेल्या आरोपीला चिकलठाणा पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 12 तासात बेड्या ठोकल्या

औरंगाबाद, दि. 1 - पत्नीची छेड काढल्याच्या कारणावरुन 19 वर्षीय तरुणाला घराबाहेर बोलावून नेत त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची थरारक घटना गुरूवारी रात्री  चिंचोळी येथील तोळानाईक तांडा(ता. औरंगाबाद)येथे घडली. हत्या करून पसार झालेल्या आरोपीला चिकलठाणा पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 12 तासात बेड्या ठोकण्यात यश आले.

रवींद्र कल्याण जाधव(19,रा.तोळानाईक तांडा, चिंचोळी)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रामेश्वर शिवलाल पवार(21,रा. तोळानाईक तांडा)असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती देताना चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि मयत हे परस्परांचे नातेवाईक आहे. रविंद्र आयटीआयचा विद्यार्थी होता तर  रामेश्वर हा औरंगाबादेत बी.ए.प्रथम वर्षात शिकतो आणि पोलीस भरतीची तयारी करायचा. त्याचे लग्न झालेले असून तो गणेशोत्सवानिमित्त सहपत्नीक चिंचोळी तांडा येथे आला होता. गुरूवारी रात्री रविंद्रने त्याच्या पत्नीची छेड काढल्याचे त्यास काळाले. यामुळे तो रागाने संतप्त झाला आणि त्याला शोधत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विष्णू जाधव याच्या घरी गेला. तेथे  रविंद्र आणि त्याचा मावसभाऊ नवनाथ जाधव यांच्यासोबत  टिव्ही पहात बसला होता. यावेळी  काम आहे, जरा  बाहेर ये असे तो दारातूनच रविंद्रला म्हणाला. यानंतर  तो रविंद्रला त्याच्या घरापासून काही अंतरावर अंधारात घेऊन गेला.  तेथे त्याने रविंद्रच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरापासून सुमारे ५०० मिटरवरील ज्वारीच्या शेतात फेकून देऊन तो तेथून पसार झाला. रविंद्र आणि रामेश्वर यांचे भांडण झाल्याची  बाब गावातील त्याच्या नातेवाईकांना समजली. यांनतर ते त्यास शोधत असताना ज्वारीच्या शेतात गंभीर जखमी आणि बेशुद्धावस्थेत रविंद्र पडलेला दिसला. त्यांनी रात्री त्यास एका वाहनातून प्रथम चिकलठाणा पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्यांना तात्काळ घाटीत  नेण्याचे सांगितले. घाटीतील डॉक्टरांनी रविंद्र यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.तीन पथकांनी शोधले आरोपीला-या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तात्काळ तीन पथके स्थापन करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आमले,सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले,  उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण,संदीप सोळुंके,तुपे, कर्मचारी अनिल जायभाये, दीपक सुरासे, अर्जून राठोड, नामदेव इजलकुंठे, सुभाष टिमकीकर यांच्या पथकाने रात्रभर आरोपीचा शोध घेतला.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून