शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

अवघ्या राज्याचे लक्ष! आमदार अपात्रतेवर सुनावणीला सुरुवात; आजच निकाल देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 13:49 IST

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोघांचीही बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज विधानसभेत दाखल झाली आहे. यावर आता दोन्ही बाजुच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

राज्यातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरु होऊन काही महिने उलटले आहेत. आता पहिल्या अंकावरील सुनावणीला विधानसभा अध्यक्षांनी आजपासून सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोघांचीही बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज विधानसभेत दाखल झाली आहे. यावर आता दोन्ही बाजुच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

आज सुनावणी होईल. आमचे वकील आमची बाजू मांडतील. आम्ही अध्यक्षांना सांगू की आजच्या दिवसातच ही हेअरिंग संपवा आणि निर्णय द्या. महाराष्ट्रात सर्वांना या निर्णयाची उत्सुकता आहे तर अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांनी केली आहे. 

ठराविक वेळेत व्हायला हवी होती ती सुनावणी आता होत आहे. सुप्रिम कोर्टाने जे निर्णय दिला आहे त्याचा सन्मान राखून निर्णय घ्यावा. सुप्रिम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर कोणती संस्था वेगळा निर्णय घेत नाही. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती चुकीची आहे, सुनील प्रभू प्रतोद आहेत. यामुळे आम्हाला दिलेली नोटीस ही चुकीची आहे असं माझे मत आहे. स्वायत्त संस्था कोणता निर्णय घेणार हे सत्ताधारी सांगतात यावरून स्वायत्त संस्था कोणत्या परिस्थितीत आहेत हे लक्षात घ्या, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. 

तर शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला विश्वास आहे अध्यक्षांचा निकाल शिंदेंच्या आमदारांच्या बाजूने येईल. विरोधक विरोधकांचे काम करत आहेत - शिवसेना पक्ष आमच्याकडे आहे.  चिन्ह आमच्याकडे आहे. अध्यक्षांमार्फत येणारा निर्णय आधी येऊद्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये जातील किंवा हायकोर्टमध्ये जातील हा विरोधकांचा विषय आहे, असे कदम म्हणाले. 

आमचे वकील आमची बाजू मांडण्यासाठी देखील तयार आहेत. जे घटनेमध्ये लिहिले आहे ते घटनेच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही. आम्हाला नाही वाटत आमच्यावर कारवाई होईल याची आम्हाला खात्री आहे, असे प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे. 

आज अध्यक्षांसमोर शिवसेनेचे आमदार पात्र की अपात्र, शिवसेना पक्ष  चिन्ह कोणाचं ह्यावर सुनावणी होणार आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. अध्यक्ष देतील तो निकाल आमच्या बाजूनेच लागण्याची शक्यता दाट आहे. कोण जिंकेल कोण हरेल या निकालावर सर्व जनतेचे लक्ष आहे. आज निकालात दूध का दूध पानी का पानी होईलच, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षvidhan sabhaविधानसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना