शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Maharashtra Vidhan Sabha: "एकनाथ शिंदेजी, ...तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल’’, भास्कर जाधवांचं भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 13:51 IST

Maharashtra Vidhan Sabha: विधानसभेत आज सादर झालेल्या एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासमत प्रस्तावामध्ये सरकारने बहुमत मिळवलं आहे. यावेळी शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक भाषण करत शिंदे गट आणि भाजपा यांच्या आघाडीवर खोचक शब्दांमध्ये जोरदार टीका केली.

मुंबई - विधानसभेत आज सादर झालेल्या एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासमत प्रस्तावामध्ये सरकारने बहुमत मिळवलं आहे. त्यानंतर सरकारच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून सभागृहात जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक भाषण करत शिंदे गट आणि भाजपा यांच्या आघाडीवर खोचक शब्दांमध्ये जोरदार टीका केली. तसेच भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भावनिक आवाहन केले आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, एकनाथ शिंदे माझे जवळचे मित्र आहेत. पण आपल्या फारशा भेटीगाठी झाल्या नाहीत. तसेच फारशी बोलचालही झाली नाही. मात्र गतवर्षी कोकणात आलेल्या पुरामध्ये तुम्ही मोलाचं काम केलं हे मी मान्य करतो. पण आता कोण कोणाविरोधात लढणार आहे. तर आमदार विरोधात गेलेत आणि शिवसैनिक छातीचा कोट करून खंबीरपणे लढताहेत. महाराष्ट्रात महाभारताची पुनरावृत्ती होणार आहे, अशी भीती भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपा हा तुमचा वापर शिवसेनेविरोधात करून घेत आहे, असं सांगत भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक आवाहन केलं. ते म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तुम्हाला भाजपावाले लढवताहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना असे वाद लावून लढवताहेत. मात्र यामध्ये रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल. यात घायाळ होतील ते शिवसैनिक होतील. संपेल ती शिवसेना संपेल. भाजपाचा २५ वर्षांचा इतिहास पाहिला तर तो शिवसेनेला संपण्याचा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्याबद्दल यांना काहीही प्रेम आलेलं नाही. याची मी अनेक उदाहरणं मी सांगू शकेन. तुम्ही मुख्यमंत्री झालात, याबाबत मी आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची यासाठी दोन पावलं माघारी या, असं मी तुम्हाला आवाहन करतो.  एकनाथरावजी, तुम्ही  शिवसेना फुटू दिली नाही. फुटीपासून वाचवली तर हा संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल, असं भावनिक आवाहनही भास्कर जाधव यांनी यावेळी केलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBhaskar Jadhavभास्कर जाधवShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा