शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘मुख्यमंत्री व्हायचे का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना केला होता’; आदित्य ठाकरे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 08:27 IST

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेतृत्वाकडून सध्या मुंबईत विविध मेळावे घेतले जात आहेत.

मुंबई : महिनाभरापूर्वीपासूनच कुरबूर सुरू होती. तेव्हा २० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वर्षावर बोलावून घेत तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा थेट प्रश्न केला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी इतर मुद्दे मांडत मूळ प्रश्नाला बगल दिली, असा आरोप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेतृत्वाकडून सध्या मुंबईत विविध मेळावे घेतले जात आहेत. कलिना येथे शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा थेट प्रश्न विचारल्यावर प्रश्न टाळत निधी मिळत नाही, आमदारांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा आहे, ही फाईल उघडली आहे-ती फाईल उघडली आहे, अशी भाषा त्यांनी केली. नाटक केले, रडगाणे झाले. पण या २० जूनला व्हायचे होते ते झालेच. तरीही तिथले १५ ते २० लोक आपल्या संपर्कात आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. 

विजय हा शिवसेनेचाच --  आमचाच गट अधिकृत, आम्ही बाळासाहेब ठाकरे शिवसेना, ही नावे लावण्याची तुमची लायकी असती तर तुम्ही बंड करायला सुरतला पळाला नसता. - बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे भक्त असते तर त्यांनी समोर येऊन सांगितले असते की मला मुख्यमंत्री बनवा. महाराष्ट्रात लपून बसायची हिंमत नाही, म्हणून गुवाहाटीला पळाले, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला. - विरोधी पक्षात बसण्यासाठी केलेले हे देशातील पहिलेच बंड असेल. पण ते विधानसभेत येणार नाहीत, याची पुरेपूर काळजी आम्ही घेत आहोत. आकड्यांचा खेळ आता कसाही दिसत असला तरी सभागृहात विजय हा शिवसेनेचाच होईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे