शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘मुख्यमंत्री व्हायचे का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना केला होता’; आदित्य ठाकरे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 08:27 IST

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेतृत्वाकडून सध्या मुंबईत विविध मेळावे घेतले जात आहेत.

मुंबई : महिनाभरापूर्वीपासूनच कुरबूर सुरू होती. तेव्हा २० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वर्षावर बोलावून घेत तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा थेट प्रश्न केला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी इतर मुद्दे मांडत मूळ प्रश्नाला बगल दिली, असा आरोप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेतृत्वाकडून सध्या मुंबईत विविध मेळावे घेतले जात आहेत. कलिना येथे शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा थेट प्रश्न विचारल्यावर प्रश्न टाळत निधी मिळत नाही, आमदारांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा आहे, ही फाईल उघडली आहे-ती फाईल उघडली आहे, अशी भाषा त्यांनी केली. नाटक केले, रडगाणे झाले. पण या २० जूनला व्हायचे होते ते झालेच. तरीही तिथले १५ ते २० लोक आपल्या संपर्कात आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. 

विजय हा शिवसेनेचाच --  आमचाच गट अधिकृत, आम्ही बाळासाहेब ठाकरे शिवसेना, ही नावे लावण्याची तुमची लायकी असती तर तुम्ही बंड करायला सुरतला पळाला नसता. - बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे भक्त असते तर त्यांनी समोर येऊन सांगितले असते की मला मुख्यमंत्री बनवा. महाराष्ट्रात लपून बसायची हिंमत नाही, म्हणून गुवाहाटीला पळाले, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला. - विरोधी पक्षात बसण्यासाठी केलेले हे देशातील पहिलेच बंड असेल. पण ते विधानसभेत येणार नाहीत, याची पुरेपूर काळजी आम्ही घेत आहोत. आकड्यांचा खेळ आता कसाही दिसत असला तरी सभागृहात विजय हा शिवसेनेचाच होईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे