शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Eknath Shinde: "मला 'एसंशिं' म्हणता तुम्ही 'यूटी' म्हणजे यूज अँड थ्रो का?"; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:31 IST

Eknath Shinde on Uddhav Thackeray Comment: एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. "वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? तर नाही. आम्ही हिंदुत्व सोडले असे काही बाटगे म्हणतात मग तुमच्या आजूबाजूला मुस्लिमांचे कौतुक होत होते तेव्हा तुम्ही का गप्प बसला?" असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिंदेसेना आणि भाजपावर हल्लाबोल केला. याला आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.   

"मला 'एसंशिं' म्हणता तुम्ही 'यूटी' म्हणजे यूज अँड थ्रो का?, राहुल गांधींच्या सोबत राहिल्याने उबाठाला वारंवार जिनांची आठवण येते, हे दुर्दैव आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काय करायचं हे समजत नाही" असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.  "कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाठासाठी दुर्दैवी दिवस होता. ते म्हणतात आमचा वक्फ बिलाला विरोध नाही तर भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध आहे. अतिशय गोंधळलेल्या परिस्थिती काय बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे सूचत नसलेलं आज दिसलं आहे. धरलं की चावतंय आणि सोडलं की पडतंय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे."

"पायाखालची वाळू सरकली"

"देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेबांचा पाठिंबा होता. तिच भूमिका आमची आहे, भाजपाची आहे. देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना मग ते कोणीही असो त्यांना आमचा विरोध आहे. बाळासाहेब जी भूमिका घेऊन चालले तिच भूमिका या वक्फ बोर्डाच्या वेळी भाजपानेही दाखवली. सातत्याने राहुल गांधी यांची सावली असल्यामुळे, त्यांच्यासोबत राहिल्याने उबाठाला वारंवार जिनांची आठवण येते. हे दुर्दैव आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काय करायचं हे समजत नाही. हे स्वत:ची अब्रू काढून घेण्यासारखं आहे" असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली आहे. 

"यूटी म्हणजे यूज अँड थ्रो का?"

"वक्फ बोर्डाचं बिल आणल्याने काही मुठभर लोकांच्या हातात लाखो, करोडो एकर जी जमीन होती त्याला चाप बसणार आहे. मोदीजींच्या वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे मुठभर लोकांना चाप बसेल, निर्बंध बसेल. मुस्लिम लोकांनी याचं स्वागत केलेलं आहे. गोंधळलेल्या अवस्थेत एखादं नेतृत्त्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास संपुष्टात येत असतो. त्यांची जी परिस्थिती झाली आहे ती महाराष्ट्र पाहतोय. आम्ही बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत. वैचारिक तडजोड करणार नाही. मला एसंशिं म्हणता तुम्ही यूटी म्हणजे यूज अँड थ्रो का? मला बोलायला लावू नका. मी शांत आहे. मला गद्दार, खोके म्हणालात. तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेने खोक्यात बंद करून टाकलं. आम्ही ८० लढवल्या आणि ६० आलो... त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने गद्दार कोण याचा फैसला केला आहे" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाwaqf board amendment billवक्फ बोर्ड