शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयांचा करणार फेरविचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:28 IST

 राज्य सरकारच्या अनेक निर्णयांवर भाजपने टीकेची झोड उठविली होती. त्यात घोटाळ्यांचे आरोपदेखील केले होते. अशा निर्णयांच्या फायली तपासायची भूमिका नवीन सरकारकडून घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयांच्या चौकशीसाठी एखादी समितीदेखील नेमली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांमध्ये घेतलेल्या निर्णयांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नवे सरकार फेरविचार करणार आहे. कोणत्या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आले होते, हेही तपासले जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

 राज्य सरकारच्या अनेक निर्णयांवर भाजपने टीकेची झोड उठविली होती. त्यात घोटाळ्यांचे आरोपदेखील केले होते. अशा निर्णयांच्या फायली तपासायची भूमिका नवीन सरकारकडून घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयांच्या चौकशीसाठी एखादी समितीदेखील नेमली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

 आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय सरसकट बदलण्याची आमची भूमिका नसेल, पण राज्य सरकारचा निधी अनाठायी खर्च होत असून त्यात कंत्राटदारांचे हित साधले जात असल्याचे लक्षात आले तर अशा कामांना स्थगिती दिल्याशिवाय पर्याय नसेल असे गेल्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. 

 राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या दोन बैठकांमध्ये घेतलेले निर्णयदेखील तपासून बघितले जाणार आहेत. शेवटच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या निर्णयासह अन्य काही धोरणात्मक निर्णयदेखील घेण्यात आले होते. एका बैठकीतील निर्णय हे नंतरच्या बैठकीत कायम केले जातात. त्यामुळे ठाकरे सरकारच्या शेवटच्या बैठकीतील निर्णयांवर शिक्कामोर्तब हे शिंदे यांच्या मंत्रिमंडळाला करावे लागणार आहे. 

शेवटच्या सात दिवसात ज्या पद्धतीने शेकडो शासन आदेश काढण्यात आले ते संशयास्पद असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. त्यावर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयांच्या फायली आपल्याकडे पाठवा, असे आदेश आधीच राज्य सरकारला दिले आहेत. 

देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेवटच्या दिवसांतील निर्णयांचा फेरविचार नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारनेदेखील केला होता आणि काही कामांना स्थगितीदेखील दिली होती.  

जलयुक्त शिवार योजना नव्या स्वरूपात परतणार! - nदेवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रॉजेक्ट’ असलेली जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती. एवढेच नव्हे तर या योजनेची चौकशी करण्यासाठी माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांची समितीही नेमण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली. त्याचवेळी विधिमंडळाच्या लोकलेखा समितीला जलसंधारण विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालात या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे लेखी सांगण्यात आले होते. त्यावरून वादळ उठले होते. - या पार्श्वभूमीवर, शिंदे सरकार नवीन स्वरूपात ही योजना पुन्हा राबवतील, अशी शक्यता आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ झाला, अनेक गावांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात केली हे त्यांनी आकडेवारीनिशी सांगितले होते. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना ३३ कोटी वृक्षलागवडीची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने राबविली. या योजनेची चौकशी महाविकास आघाडी सरकारने केली होती. ती आता गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा