शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खरे शिवसैनिक नेमके आहेत तरी कोण? हे की ते?; कट्टर शिवसैनिकांमध्येही संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 06:16 IST

शिवसेनेतील उलथापालथीनंतर खरे शिवसैनिक नेमके आहेत तरी कोण, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दगडू सकपाळ, माजी आमदार, शिवसेना

शिवसेना या पक्षाची ५० वर्षांपूर्वी नोंदणी झाली. आतापर्यंतच्या काळात पक्षात आमदार झाले किती आणि बाहेर गेले किती, याचा काही हिशोब नाही. कोणीही गेले तरी मूळ शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि राहणार. आता आमदारांचा एखादा गट फुटून गेला म्हणून त्यात बदल होणार नाही. 

जे बाहेर पडले त्यांनी शिवसेना हे नाव किंवा पक्षाचे चिन्ह वापरू नये. बाळासाहेबांचे नाव वापरण्याचा तर त्यांना अधिकारच नाही. शिवसेना ही एखाद्या स्थिर झाडासारखी आहे. त्याची जुनी पाने गळाली तरी तिथे नवीन येतात, पुन्हा बहर येणारच. शिवसेनेत आजवर किती बंडखोर झाले, याची गणतीच नाही. जे जातात त्यांची आम्ही परवा करत नाही. राहिले तेच शिवसैनिक. जाणाऱ्यांना ना पक्षाचे नाव वापरायचा अधिकार आहे, ना चिन्ह. सध्या फुटून गेलेल्या आमदारांनी आम्हीच शिवसेना आहोत, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात असल्याची भाषा चालविली आहे. 

यापूर्वीही जे फुटले त्यांनीही दुसऱ्या पक्षात स्थिरस्थावर होईपर्यंत अशीच भाषा केली होती. एकदा दुसऱ्या पक्षात ‘सेट’ झाले की, सगळे विसरले जाते. त्यामुळे आतापासूनच ती वापरू नका. आनंद दिघे यांनी तर आपल्या आयुष्यात कधीच फितुरांना साथ दिली नाही. दुसरा आनंद दिघे होणे नाही. शिवसेना धक्के पचविण्यास सक्षम आहे. शिवसैनिक पुन्हा पक्ष उभा करतील. 

नरेश म्हस्के, माजी महापौर, ठाणे ठाणे  महापालिकेतील सर्व ६७ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेना सांभाळली म्हणून आम्ही शिंदे यांच्याबरोबर आहोत. मागील अडीच वर्षे राष्ट्रवादीकडून शिवसेनेची गळचेपी सुरू होती. त्यातूनच हे बंड झाले आहे, परंतु आम्ही आजही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेतच राहणार आहोत. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. त्याच ठाण्यातून आता शिंदे यांना साथ दिली जात आहे, हे बोलके आहे. हिंदुत्वाची भूमिका शिंदे यांनी घेतली आहे.

महाविकास आघाडीत हीच हिंदुत्वाची भूमिका हरवल्याचे अनुभवास आले. त्यामुळे आमदारांमधील खदखद वाढत होती. ही खदखद शिंदे यांनी ओळखली आणि त्यातून हे बंड झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडावी, हा आमचा मुख्य उद्देश होता. राष्ट्रवादीकडून वारंवार शिवसेनेची गळचेपी झाली. त्यामुळे शिवसेना संपत असल्याचे दिसत होते. भविष्यात शिवसेना टिकली पाहिजे, वाचली पाहिजे, वाढली पाहिजे म्हणून आम्ही शिवसेनेच्या बाजूने आहोत. शिंदे यांनी हिंदुत्वाचा मांडलेला मुद्दा चुकीचा असेल तर त्यांनी सांगावे. शिवसेनेची मूळ भूमिका पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे गैर आहे का? महाविकास आघाडीत असताना मी जेव्हा महापौर होतो, त्या काळात राष्ट्रवादीकडून वारंवार आमच्या विरोधात कारवाया सुरू होत्या. त्यांनी मला खूप त्रास दिला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे