शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

खरे शिवसैनिक नेमके आहेत तरी कोण? हे की ते?; कट्टर शिवसैनिकांमध्येही संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 06:16 IST

शिवसेनेतील उलथापालथीनंतर खरे शिवसैनिक नेमके आहेत तरी कोण, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दगडू सकपाळ, माजी आमदार, शिवसेना

शिवसेना या पक्षाची ५० वर्षांपूर्वी नोंदणी झाली. आतापर्यंतच्या काळात पक्षात आमदार झाले किती आणि बाहेर गेले किती, याचा काही हिशोब नाही. कोणीही गेले तरी मूळ शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि राहणार. आता आमदारांचा एखादा गट फुटून गेला म्हणून त्यात बदल होणार नाही. 

जे बाहेर पडले त्यांनी शिवसेना हे नाव किंवा पक्षाचे चिन्ह वापरू नये. बाळासाहेबांचे नाव वापरण्याचा तर त्यांना अधिकारच नाही. शिवसेना ही एखाद्या स्थिर झाडासारखी आहे. त्याची जुनी पाने गळाली तरी तिथे नवीन येतात, पुन्हा बहर येणारच. शिवसेनेत आजवर किती बंडखोर झाले, याची गणतीच नाही. जे जातात त्यांची आम्ही परवा करत नाही. राहिले तेच शिवसैनिक. जाणाऱ्यांना ना पक्षाचे नाव वापरायचा अधिकार आहे, ना चिन्ह. सध्या फुटून गेलेल्या आमदारांनी आम्हीच शिवसेना आहोत, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात असल्याची भाषा चालविली आहे. 

यापूर्वीही जे फुटले त्यांनीही दुसऱ्या पक्षात स्थिरस्थावर होईपर्यंत अशीच भाषा केली होती. एकदा दुसऱ्या पक्षात ‘सेट’ झाले की, सगळे विसरले जाते. त्यामुळे आतापासूनच ती वापरू नका. आनंद दिघे यांनी तर आपल्या आयुष्यात कधीच फितुरांना साथ दिली नाही. दुसरा आनंद दिघे होणे नाही. शिवसेना धक्के पचविण्यास सक्षम आहे. शिवसैनिक पुन्हा पक्ष उभा करतील. 

नरेश म्हस्के, माजी महापौर, ठाणे ठाणे  महापालिकेतील सर्व ६७ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेना सांभाळली म्हणून आम्ही शिंदे यांच्याबरोबर आहोत. मागील अडीच वर्षे राष्ट्रवादीकडून शिवसेनेची गळचेपी सुरू होती. त्यातूनच हे बंड झाले आहे, परंतु आम्ही आजही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेतच राहणार आहोत. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. त्याच ठाण्यातून आता शिंदे यांना साथ दिली जात आहे, हे बोलके आहे. हिंदुत्वाची भूमिका शिंदे यांनी घेतली आहे.

महाविकास आघाडीत हीच हिंदुत्वाची भूमिका हरवल्याचे अनुभवास आले. त्यामुळे आमदारांमधील खदखद वाढत होती. ही खदखद शिंदे यांनी ओळखली आणि त्यातून हे बंड झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडावी, हा आमचा मुख्य उद्देश होता. राष्ट्रवादीकडून वारंवार शिवसेनेची गळचेपी झाली. त्यामुळे शिवसेना संपत असल्याचे दिसत होते. भविष्यात शिवसेना टिकली पाहिजे, वाचली पाहिजे, वाढली पाहिजे म्हणून आम्ही शिवसेनेच्या बाजूने आहोत. शिंदे यांनी हिंदुत्वाचा मांडलेला मुद्दा चुकीचा असेल तर त्यांनी सांगावे. शिवसेनेची मूळ भूमिका पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे गैर आहे का? महाविकास आघाडीत असताना मी जेव्हा महापौर होतो, त्या काळात राष्ट्रवादीकडून वारंवार आमच्या विरोधात कारवाया सुरू होत्या. त्यांनी मला खूप त्रास दिला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे