शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

खरे शिवसैनिक नेमके आहेत तरी कोण? हे की ते?; कट्टर शिवसैनिकांमध्येही संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 06:16 IST

शिवसेनेतील उलथापालथीनंतर खरे शिवसैनिक नेमके आहेत तरी कोण, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दगडू सकपाळ, माजी आमदार, शिवसेना

शिवसेना या पक्षाची ५० वर्षांपूर्वी नोंदणी झाली. आतापर्यंतच्या काळात पक्षात आमदार झाले किती आणि बाहेर गेले किती, याचा काही हिशोब नाही. कोणीही गेले तरी मूळ शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि राहणार. आता आमदारांचा एखादा गट फुटून गेला म्हणून त्यात बदल होणार नाही. 

जे बाहेर पडले त्यांनी शिवसेना हे नाव किंवा पक्षाचे चिन्ह वापरू नये. बाळासाहेबांचे नाव वापरण्याचा तर त्यांना अधिकारच नाही. शिवसेना ही एखाद्या स्थिर झाडासारखी आहे. त्याची जुनी पाने गळाली तरी तिथे नवीन येतात, पुन्हा बहर येणारच. शिवसेनेत आजवर किती बंडखोर झाले, याची गणतीच नाही. जे जातात त्यांची आम्ही परवा करत नाही. राहिले तेच शिवसैनिक. जाणाऱ्यांना ना पक्षाचे नाव वापरायचा अधिकार आहे, ना चिन्ह. सध्या फुटून गेलेल्या आमदारांनी आम्हीच शिवसेना आहोत, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात असल्याची भाषा चालविली आहे. 

यापूर्वीही जे फुटले त्यांनीही दुसऱ्या पक्षात स्थिरस्थावर होईपर्यंत अशीच भाषा केली होती. एकदा दुसऱ्या पक्षात ‘सेट’ झाले की, सगळे विसरले जाते. त्यामुळे आतापासूनच ती वापरू नका. आनंद दिघे यांनी तर आपल्या आयुष्यात कधीच फितुरांना साथ दिली नाही. दुसरा आनंद दिघे होणे नाही. शिवसेना धक्के पचविण्यास सक्षम आहे. शिवसैनिक पुन्हा पक्ष उभा करतील. 

नरेश म्हस्के, माजी महापौर, ठाणे ठाणे  महापालिकेतील सर्व ६७ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेना सांभाळली म्हणून आम्ही शिंदे यांच्याबरोबर आहोत. मागील अडीच वर्षे राष्ट्रवादीकडून शिवसेनेची गळचेपी सुरू होती. त्यातूनच हे बंड झाले आहे, परंतु आम्ही आजही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेतच राहणार आहोत. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. त्याच ठाण्यातून आता शिंदे यांना साथ दिली जात आहे, हे बोलके आहे. हिंदुत्वाची भूमिका शिंदे यांनी घेतली आहे.

महाविकास आघाडीत हीच हिंदुत्वाची भूमिका हरवल्याचे अनुभवास आले. त्यामुळे आमदारांमधील खदखद वाढत होती. ही खदखद शिंदे यांनी ओळखली आणि त्यातून हे बंड झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडावी, हा आमचा मुख्य उद्देश होता. राष्ट्रवादीकडून वारंवार शिवसेनेची गळचेपी झाली. त्यामुळे शिवसेना संपत असल्याचे दिसत होते. भविष्यात शिवसेना टिकली पाहिजे, वाचली पाहिजे, वाढली पाहिजे म्हणून आम्ही शिवसेनेच्या बाजूने आहोत. शिंदे यांनी हिंदुत्वाचा मांडलेला मुद्दा चुकीचा असेल तर त्यांनी सांगावे. शिवसेनेची मूळ भूमिका पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे गैर आहे का? महाविकास आघाडीत असताना मी जेव्हा महापौर होतो, त्या काळात राष्ट्रवादीकडून वारंवार आमच्या विरोधात कारवाया सुरू होत्या. त्यांनी मला खूप त्रास दिला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे