Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील, तुम्ही सगळे परत या..." आमदार संतोष बांगर ढसाढसा रडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:38 PM2022-06-24T12:38:46+5:302022-06-24T12:40:12+5:30

Eknath Shinde Revolt: मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा एक गट आधी सूरत व नंतर गुवाहटीत गेल्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर संकटाचे ढग आहेत.

Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | "Uddhav Thackeray will forgive you, you all come back" MLA Santosh Bangar's appeal to rebel MLA | Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील, तुम्ही सगळे परत या..." आमदार संतोष बांगर ढसाढसा रडले

Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील, तुम्ही सगळे परत या..." आमदार संतोष बांगर ढसाढसा रडले

googlenewsNext

हिंगोली: मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा एक गट आधी सूरत व नंतर गुवाहटीत गेल्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर संकटाचे ढग आहेत. या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मात्र शिवसेनेसोबतच राहणे पसंत केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेच नेतृत्व मान्य केले. मात्र या घडामोडी घडत असताना त्यांनी मुंबई सोडली नव्हती. 

'उद्धव साहेब माफ करतील'
संतोष बांगर हे मुंबईहून शुक्रवारी सकाळी हिंगोलीत परतले. येथे त्यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. यावेळी बंडखोर आमदारांना परतीचे आवाहन करताना त्यांना रडू कोसळले. "तुम्ही काही दिवसापासून बघत आहात, वातावरण अतिशय वाईट आहे. त्या सर्व आमदारांना माझी कळकळीची विनंती आहे. ज्यांनी-ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, त्यांच्यावर पुन्हा गुलाल उधळला नाही. म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की, तुम्ही उद्धव ठाकरेंकडे या. साहेब शंभर टक्के तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाहीत."


'भगवा आबाद ठेवा'
"छत्रपती शिवरायांचा जो भगवा बाळासाहेबांनी आपल्या खांद्यावर दिलाय, तो आबाद ठेवण्याचे काम सर्वांनी करावं. हीच कळकळीची विनंती तुम्हाला करतो. मला आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांनाही विनंती करायची आहे, तुम्ही सगळे एकत्र या. तुम्ही जो निर्णय घ्याल, त्यात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. फक्त एकच काम करा, छत्रपतींच्या भगव्याला डाग लावू देऊ नका." 

'शिवसैनिक पक्षासोबतच आहे'
ते पुढे म्हणाले की, "मी निवडून आल्यावर जेवढा सत्कार, सन्मान झाला नव्हता, तेवढा आज झाला. त्यामुळे आमदार कुठेही गेले तर शिवसैनिक ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे. अंगावरचा भगवा हटला तर आम्ही काहीच नाही. कितीही ऑफर आल्या तरीही बळी पडणार नाही. माझ्यासारखा किराणा दुकान चालविणारा माणूस आज आमदार झाला, हेच शिवसेनेच मोठेपण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा हळव्या मनाचा माणूस आहे. ते वर्षा बंगला सोडत होते, तर लोक रडताना मी पाहिले. त्यामुळे या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे साकडे मी विठ्ठलाला घालत आहे", असेही ते म्हणाले.

Web Title: Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | "Uddhav Thackeray will forgive you, you all come back" MLA Santosh Bangar's appeal to rebel MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.