शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

एकनाथ शिंदे यांचा गट मनसेत सामील होणार? बंडखोर दिपक केसरकर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 21:55 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

Maharashtra Political Crisis:  शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. पण, शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलिनीकरण करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे शिवसेनेच्या वकिलाकडून सांगण्यात आले आहे. 

पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाईपासून वाचवायचे असेल तर एकूण संख्याबळापैकी दोन तृतीयांश संख्या गटाला आवश्यक असते, पण तो गट एखाद्या पक्षात विलिनी व्हावा लागतो. अन्यथा बहुमत असूनही कारवाई होऊ शकते, असे शिवसेनेचे वकील म्हणाले होते. यातच, शिंदे गट मनसेत सामील होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

दिपक केसरकर काय म्हणालेया सर्व चर्चांवर शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "आम्हाला कोणत्याच गटात सामील होण्याची आवश्यकता नाही, आम्ही शिवसेनेचा भाग आहोत. आमचा हा मूळ शिवसेनेचा गट आहे, जे उरलेले 14 आमदार आहेत त्यांनी कोणत्या गटात जायचं ते त्यांनी ठरवावं. आम्हाला कोणत्याच पक्षात जायची गरज नाही, आमचा मूळ पक्ष हा शिवसेनाच आहे" असं केसरकर म्हणाले. 

संजय राऊतांसारखा प्रवक्ता मिळू नये केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. 'बंडखोरी करणाऱ्या आमदरांचे शंभर बाप आहेत', असे वक्तव्य संजय  राऊत यांनी केले होते. याबाबत देखील दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ''संजय राऊत यांनी आमच्या मातांचा अपमान केलाय. कोणत्याही पक्षाला संजय राऊत यांच्यासारखा प्रवक्ता मिळून नये. पक्षासाठी रक्त सांडलेल्या लोकांची संजय राऊत नाचक्की करतात.  राऊतांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. संजय राऊत यांच्यासारखे प्रवक्ते मिळाले तर शिवसेना कधीच वाढणार नाही," असेही केसरकर म्हणाले. 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMNSमनसे