शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिंदे गटाच्या ३४ आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र; जाणून घ्या काय म्हटलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 16:52 IST

शिंदे यांनी त्यांच्या समर्थक ३४ शिवसेना आमदारांचे पत्र विधान भवनाला पाठवले आहे. या पत्रात २ ठराव आमदारांनी मांडल्याचे कळवलं आहे.

मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. शिंदे आणि समर्थक आमदार पक्षनेतृत्वाच्या विरोधात गेल्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता धोक्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३४ आमदारांचे पाठबळ असून याबाबत आता त्यांनी विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवल्याने उघड झाले आहे. 

वर्षावरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केली. त्यांच्याऐवजी अजय चौधरी यांची नेमणूक केली. त्यानंतर मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून सर्व आमदारांना पत्र पाठवलं. या पत्रात २२ जून संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहावे असा आदेश दिला. त्याचसोबत जर बैठकीस उपस्थित राहिले नाही तर आपण शिवसेना पक्ष सोडत असल्याचं गृहित धरून सदस्यत्व अपात्र करण्याची कारवाई केली जाईल म्हटलं. 

शिवसेनेच्या या खेळीवर एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले. शिंदे यांनी त्यांच्या समर्थक ३४ शिवसेना आमदारांचे पत्र विधान भवनाला पाठवले आहे. या पत्रात २ ठराव आमदारांनी मांडल्याचे कळवलं आहे. त्यात २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. ती यापुढेही कायम राहील असा ठराव आहे. त्याचसोबत मुख्य प्रतोदपदी आमदार भरत गोगावले यांची निवड करण्यात आल्याचं सांगत सुनील प्रभू यांचं तातडीने मुख्य प्रतोद रद्द केल्याचं सांगण्यात आले आहे. 

या पत्रात काय म्हटलंय?

सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप, पोलीस बदल्यांमधील घोटाळा, मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यासारखे मंत्री जेलमध्ये असल्याने आमचे सदस्य आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावं लागत आहे. त्याचसोबत स्थानिक पातळीवर आमची राजकीय प्रतिमा यामुळे मलिन होत आहे. जे सरकारमध्ये आमच्या सोबत आहेत ते पदाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतायेत. आमच्या पक्षाच्या म्हणजेच शिवसेनेला वैचारिकदृष्ट्या विरोध करणाऱ्या एनसीपी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आपल्या पक्षाचा कट्टर वैचारिक आधार असलेल्या आणि स्थानिक मराठी लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेच्या तत्त्वांशी तडजोड झाली आहे. गेली अडीच वर्षे आमचा पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी विसंगत विचारसरणीशी जुळवून घेत पक्षाच्या तत्त्वांशी तडजोड केली आहे.

आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांना पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार हिंदुत्ववादी विचारधारेशी तडजोड न करता दिले होते. परंतु विचारधारेच्या विरोधात जात पक्षाचे नुकसान होत आहे. २०१९ मध्ये भाजपासोबत युती बनवून त्यानंतर विचारधारेच्या विरोधात जात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता बनवली. त्याचा नकरात्मक परिणाम मतदार आणि शिवसैनिकांमध्ये झाला. याबाबत पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला लक्षात ठेवता भ्रष्ट कारभाराच्या सरकारमध्ये शिवसेनेलाही टीका सहन करावी लागत आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना