शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला अजित पवार जबाबदार?; काँग्रेसचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 17:52 IST

काँग्रेसचे ४४ आमदार एकत्र आहेत. विधान परिषदेत आपसात लढाई होती. त्यामुळे व्होट क्रॉसिंग झाली असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

मुंबई - राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे समर्थक ४० हून अधिक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे मी मुख्यमंत्री नको असेन तर मला येऊन सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे. त्यातच आता शिंदे यांच्या बंडखोरीवरून काँग्रेसनं अजित पवारांना जबाबदार धरलंय का असा प्रश्न निर्माण होतो. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिवसेना-भाजपात लढाई झाली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमातून पुढे आले. सरकार जनतेसाठी काम करेल हा विचार होता. अर्थ खाते राष्ट्रवादीकडे होते. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचं समोर येत होते. शिवसेनेच्या आमदारांना अजित पवार त्रास द्यायचे या तक्रारी येत होत्या. काँग्रेस आमदारांनाही असाच त्रास होत होता. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला निधी मिळत नव्हता. हे सरकार जनतेसाठी होते एका पक्षासाठी नव्हतं. त्याचा विरोध आम्ही करायचो आणि हा विरोध स्वाभाविक होता असं त्यांनी सांगितले. 

तसेच काँग्रेसचे ४४ आमदार एकत्र आहेत. विधान परिषदेत आपसात लढाई होती. त्यामुळे व्होट क्रॉसिंग झाली. आम्हाला सत्तेची लालसा नाही. काँग्रेसला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला होता. आजही आमची विरोधात बसण्याची तयारी आहे. हिंदुत्व नाही ईडीचा विषय आहे. सगळ्यांना हे माहिती आहे. जनतेला सगळं ठाऊक आहे. ईडीच्या माध्यमातून भाजपा हा खेळ खेळत आहेत. सरकार ५ वर्ष चालेल. सत्तेसाठी भाजपा कुठल्या थराला जाऊ शकते हे दिसून येत असल्याचं सांगत नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले संजय राऊत?शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतु या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील घडामोडींवर भाजपाचं लक्ष"महाराष्ट्रातील घडामोडींवर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील नेत्यांचे बारीक लक्ष आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे महत्त्वाचे नेतेमंडळी देखील या घडामोडींवर नजर ठेवून आहेत. मी याबद्दल आतातरी  काही बोलणार नाही. या साऱ्या घटना पाहता महाराष्ट्राच्या हिताचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे जे निर्णय असतील ते निर्णय घेण्यास ते समर्थ आहेत", असं विधान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवार