शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Eknath Shinde Maharashtra : उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाणार का?, एकनाथ शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 12:53 IST

…तर का म्हणता मला पदावरून उतरवलं?, एकनाथ शिंदे यांचा थेट सवाल.

काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हाती मुख्यमंत्रिपदाची सूत्रं आली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारली. दरम्यान, पक्षाच्या नेत्यांमध्ये २०१९ पासूनच महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून नाराजी होती अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

इंडिया टुडे कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. “आम्ही गद्दारी केली नाही. राज्यातील लोकांना शिवसेना भाजपचं सरकार यावं अशी इच्छा होती. परंतु त्यांच्या इच्छेविरुद्ध सरकार स्थापन झालं. त्यानंतर आमच्या आमदारांचाही विरोध होता. आम्ही आदेशानुसार काम करणारे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणेच आम्ही काम करत पक्षाचा विस्तार केला. त्यांच्यानंतर आम्ही प्रमुखांचेही आदेश मानत होतो. परंतु ज्या प्रकारे अडीच वर्षात सरकार स्थापन झालं होतं, आमदारांच्या मनात आपण पुन्हा कसे निवडून येऊ, लोकांचं काम करू असे प्रश्न होते. दुर्देवानं आम्ही काही काम करू शकत नव्हतो. समस्या मुख्यमंत्री कोण होते ही नव्हती. आमचं सरकार असूनही कार्यकर्त्यांना न्याय मिळत नव्हता आणि आमदारही नाराजी व्यक्त करत होते. आम्ही अनेकदा प्रयत्नही केले होते. लोकांना आम्हाला नैसर्गिक युती हवी होती,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे हे मोदींना भेटले होते तेव्हाही पुन्हा युतीची चर्चा सुरू होती. परंतु पुढे काही होऊ शकलं नाही. त्यानंतर जे व्हायचं ते झालं,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोक विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जातात. पण आम्ही सत्तेतच होतो. जी आमची विचारधारा होती, शिवसेना प्रमुखांच्या विचारापासून दूर जाऊ लागले तेव्हा आम्ही हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

…तर का म्हणता मला पदावरून उतरवलं?“शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवू असं ते म्हणाले होते. मला मुख्यमंत्री बनायचं नव्हतं. जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तेव्हाही मुख्यमंत्री बनायचं नव्हतं. त्यांचंच म्हणणं होतं मला बनायचं नाही मग आता का म्हणतायत मला पदावरून उतरवलं? आम्ही कोणाला उतरवण्यासाठी किंवा खुर्चीवर बनवण्यासाठी हे पाऊल उचललं नाही. आम्ही राज्यासाठी आणि लोकांनी दिलेल्या कौलासाठी हा निर्णय घेतला,” असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंसोबत जाणार का?उद्धव ठाकरे आणि आपल्या संबंधात आलेला कटुपणा कधी दूर होईल की नाही माहित नाही. परंतु भाजप आणि आमच्या शिवसेनेला जनतेचं समर्थन मिळालंय हे नक्की. सध्या आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन पुढे जात आहोत. परंतु भविष्यात त्या लोकांना (उद्धव ठाकरे गट) विचार करायचाय की ते काय करतायत किंवा करतील असंही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्र