शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

Maharashtra Politics: “बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 19:44 IST

पायाखालची वाळू सरकल्याने आता आपले अस्तित्व शोधत आदित्य ठाकरे हे राज्यभर फिरत आहेत, अशी घणाघाती टीका शिंदे गटातील नेत्याने केली आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षही तीव्र होताना पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंची रत्नागिरीत शिवसंवाद यात्रा सुरू आहे. बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले असते का, अशी विचारणा शिंदे गटातील नेत्याकडून करण्यात आली आहे. 

शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले रामदास कदम यांनी आता आदित्य ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. केवळ स्वार्थासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि यांनी मुख्यमंत्री पद मिळवले. बाळासाहेबांनी हे करायला परवानगी दिली असती का? असा प्रश्न शेंबड्या मुलाला जरी विचारला असता तरी उत्तर हे नाही हेच असते, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

आपले अस्तित्व शोधत आदित्य ठाकरे हे राज्यभर फिरत आहेत

पायाखालची वाळू सरकल्याने आता आपले अस्तित्व शोधत आदित्य ठाकरे राज्यभर फिरत आहेत. मातोश्रीचे दरवाजे उघडे, पक्षाचे दरवाजे उघडे, असे म्हणतायत. राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. बाप-बेटे दोघे आमदार, खासदार मंत्र्यांना भेटले असते, तर आज वणवण भटक्याची गरज नव्हती. पण त्याचा आता उपयोग नाही. सत्ता असतानाच ही भूमिका घेतली असती तर ही दुर्देवी वेळही आली नसती, असे सांगत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांना कदापी मान्य झाले नसते

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाबरोबर युती करुन यांनीच खऱ्या अर्थाने गद्दारी केली होती. सध्याचे सरकार हे जनतेच्या मनातले आहे. जनतेला तर नाहीच पण बाळासाहेब ठाकरे यांना देखील हे कदापी मान्य झाले नसते. आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना कधीच अशा युतीमध्ये सहभागी होऊ दिले नसते. मात्र, जे झाले स्वार्थासाठीच झाले, या शब्दांत कदम यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, योगेश कदम आणि आदित्य ठाकरे हे मित्र असल्याचे सांगितले जात होते, पण वास्तव हे वेगळेच होते. दापोलीच्या नगरपरिषदेची सूत्रे ही योगेश कदम यांच्याकडेच होती. पण यामध्ये राजकारण करीत ही नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालण्यात आली होती. त्यावेळी तुमची मैत्री कुठे गेली, असा उलटप्रश्न रामदास कदम यांनी केला आहे. 

 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAaditya Thackerayआदित्य ठाकरे