शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Dahi Handi Sports Eknath Shinde: दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यामागे शिंदे-फडणवीस सरकारचं नक्की काय आहे राज'कारण'... समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 16:43 IST

शिंदेंचा हा निर्णय मास्टरस्ट्रोक असून ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारा असल्याचं राजकीय विश्लेषकांचे मत

Dahi Handi Sports, Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दहीहंडीला साहसी खेळाचा चर्जा देण्याबाबत घोषणा केली. इतकेच नव्हे तर इतर खेळांप्रमाणेच या खेळातील गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये कोटा मिळणार असल्याची घोषणा केली. पण दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याच्या शिंदे यांच्या घोषणेवर विरोधकांकडून टीका होत असल्याचे दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयावर आक्षेप नोंदविला आहे. अशा प्रकारे नोकरीत आरक्षण देणे म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांवर अन्याय असल्याची भूमिका त्यांनी मांडली. इतरही काही नेतेमंडळींनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पण असे असले तरी एकनाथ शिंदे यांनी मात्र या टीकेवर मौन बाळगले आहे. याचे कारण या निर्णयामागे एक राजकीय गणित असल्याचे विश्लेषक सांगत आहेत.

'गोविंदा'ना नोकरीची संधी

मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसह सर्व महानगरपालिका निवडणुकीच्या लवकरच येणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पाया कमकुवत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय शिंदे गटाला उपयुक्त ठरू शकतो असे राजकीय जाणकार सांगत आहेत. दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्याने, त्यातील सहभागी 'गोविंदा' कोट्याअंतर्गत सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतील. त्यांना मिळालेल्या रोजगारामुळे शिंदे गटाला आगामी निवडणुकीत मतांच्या रूपाने त्याचा फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दृष्टीने मास्टरस्ट्रोक?

सरकारच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील ठाकरे गट अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. कारण गोविंदांच्या ताफ्यात प्रामुख्याने कनिष्ठ मध्यमवर्गातील मराठी भाषिक तरुणांचा समावेश आहे. हा समाज इतके दिवस शिवसेनेचा मतदार म्हणून ओळखला जातो होता. ठाकरे गटासाठी मुंबईतील हा गट म्हणजे मतरूपी पाठिंबा देणारा पारंपारिक आधार आहे. शेजारच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यामुळे आता शिवसेनेचा हा पारंपरिक मतदार आपल्या दिशेने वळवण्यासाठी शिंदे सरकारचा हा निर्णय उपयोगी ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गोविंदा म्हणजे गुंतवणूक व दीर्घकालीन संपत्ती!

महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव विशेषत: मुंबई आणि ठाणे येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होता. एका राजकीय विश्लेषकाने सांगितले की, "कोणत्याही राजकीय पक्षासाठी एखाद्या प्रदेशात आपला प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी गोविंदा ही एक संपत्ती (गुंतवणूक) आहे. आर्थिकदृष्ट्याही कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला त्यांना निधी देणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे ही महागडी गोष्ट नाही. त्यातच निवडणुकीच्या वेळी ते त्यांच्या कामी येतात. प्रदीर्घ काळापासून शिवसेनेने आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे आणि त्यामुळे गल्लीबोळातील राजकारणात यात त्यांचा हातखंडा आहे. त्यातच आता चढाओढ पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना