शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

Dahi Handi Sports Eknath Shinde: दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यामागे शिंदे-फडणवीस सरकारचं नक्की काय आहे राज'कारण'... समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 16:43 IST

शिंदेंचा हा निर्णय मास्टरस्ट्रोक असून ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारा असल्याचं राजकीय विश्लेषकांचे मत

Dahi Handi Sports, Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दहीहंडीला साहसी खेळाचा चर्जा देण्याबाबत घोषणा केली. इतकेच नव्हे तर इतर खेळांप्रमाणेच या खेळातील गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये कोटा मिळणार असल्याची घोषणा केली. पण दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याच्या शिंदे यांच्या घोषणेवर विरोधकांकडून टीका होत असल्याचे दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयावर आक्षेप नोंदविला आहे. अशा प्रकारे नोकरीत आरक्षण देणे म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांवर अन्याय असल्याची भूमिका त्यांनी मांडली. इतरही काही नेतेमंडळींनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पण असे असले तरी एकनाथ शिंदे यांनी मात्र या टीकेवर मौन बाळगले आहे. याचे कारण या निर्णयामागे एक राजकीय गणित असल्याचे विश्लेषक सांगत आहेत.

'गोविंदा'ना नोकरीची संधी

मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसह सर्व महानगरपालिका निवडणुकीच्या लवकरच येणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पाया कमकुवत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय शिंदे गटाला उपयुक्त ठरू शकतो असे राजकीय जाणकार सांगत आहेत. दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्याने, त्यातील सहभागी 'गोविंदा' कोट्याअंतर्गत सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतील. त्यांना मिळालेल्या रोजगारामुळे शिंदे गटाला आगामी निवडणुकीत मतांच्या रूपाने त्याचा फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दृष्टीने मास्टरस्ट्रोक?

सरकारच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील ठाकरे गट अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. कारण गोविंदांच्या ताफ्यात प्रामुख्याने कनिष्ठ मध्यमवर्गातील मराठी भाषिक तरुणांचा समावेश आहे. हा समाज इतके दिवस शिवसेनेचा मतदार म्हणून ओळखला जातो होता. ठाकरे गटासाठी मुंबईतील हा गट म्हणजे मतरूपी पाठिंबा देणारा पारंपारिक आधार आहे. शेजारच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यामुळे आता शिवसेनेचा हा पारंपरिक मतदार आपल्या दिशेने वळवण्यासाठी शिंदे सरकारचा हा निर्णय उपयोगी ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गोविंदा म्हणजे गुंतवणूक व दीर्घकालीन संपत्ती!

महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव विशेषत: मुंबई आणि ठाणे येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होता. एका राजकीय विश्लेषकाने सांगितले की, "कोणत्याही राजकीय पक्षासाठी एखाद्या प्रदेशात आपला प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी गोविंदा ही एक संपत्ती (गुंतवणूक) आहे. आर्थिकदृष्ट्याही कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला त्यांना निधी देणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे ही महागडी गोष्ट नाही. त्यातच निवडणुकीच्या वेळी ते त्यांच्या कामी येतात. प्रदीर्घ काळापासून शिवसेनेने आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे आणि त्यामुळे गल्लीबोळातील राजकारणात यात त्यांचा हातखंडा आहे. त्यातच आता चढाओढ पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना