शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण नको, कधीही प्रयत्न नाही; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर शिंदे गटाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 15:55 IST

उद्धव ठाकरेंनी कोणत्याही वक्तव्य केल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाने त्यावर बोलणे उचित नाही. ठाकरे कुटुंबावर ज्या काही टीका झाल्या त्या आनंददायी होत्या असे नाही, असे माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत म्हणाले.

प्रत्येक निवडणूक ही जनतेच्या कोर्टामध्ये जाऊनच आम्ही लढत असतो. एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय हा शिवसेना वाचविण्यासाठी घेतलेला आहे. त्यांनी कधीही शिवसेनेवर टीका केलेली नाही, कधीही धनुष्यबाण स्वत:ला मिळावा म्हणून प्रयत्न केलेले नाहीत. कुठेही निशानी घेण्याचा संबंध जोडण्यात येऊ नये. जनतेमध्ये संभ्रम राहू नये, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर आली आहे. 

उद्धव ठाकरेंनी कोणत्याही वक्तव्य केल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाने त्यावर बोलणे उचित नाही. ठाकरे कुटुंबावर ज्या काही टीका झाल्या त्या आनंददायी होत्या असे नाही. काल परवाच्या बैठकीत आम्ही त्यावर बोललो आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेबांच्या कुटुंबावर टीका होऊ नये, एवढा त्यांचा आदर राखला जावा, असे आम्हाला सांगितले होते. आम्ही त्यांना तुमचा एखादा नेता असे बोलतोय हे निश्चित सांगू, असेही उदय सामंत म्हणाले. 

मातोश्रीचे दरवाजे उघडल्यावर त्यांनी आदित्य ठाकरे सामान्य शिवसैनिकांना भेटत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले. तसेच मंत्री पदावरून मी माझ्या वैयक्तिक कामांत होतो, मुंबई, सुरत, गुवाहाटी, गोवा आणि परत मुंबई असा फेरा झाला. माझ्यावर महाराष्ट्राच्या सेवेची एखादी जबाबदारी टाकली तर मी ती निश्चितपणे पार पाडेन असे उदय सामंत म्हणाले. 

उद्धव ठाकरे काय म्हणालेले...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत जाहीरपणे आपली भूमिका मांडली. "ज्यांनी बंडखोरी केली ते आजही माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. त्यांना आजही माझ्याबद्दल प्रेम वाटत आहे. ठाकरे कुटुंबीयांबद्दल आदर वाटत आहे. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हात जोडून बंडखोरांचे आभार व्यक्त केले. पण ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली त्यावेळी यातला एकही जण बोलला नव्हता. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती का?, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना लगावला.   

"धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हे जरी निवडणूक चिन्ह असलं तरी ते हाती घेतलेल्या लोकांचीही चिन्हं लोक लक्षात घेतात. माणसांना बघून लोक मतदान करत असतात. त्यामुळे मी जे बोललो त्याचा अर्थ नवीन चिन्हाचा विचार करा असा अजिबात नाही. धनुष्यबाण कधीच कुणी शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना