शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जे उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी केले; रामदास कदमांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 15:06 IST

याआधीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ ३ वेळा मंत्रालयात आले होते असा टोला कदमांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

रत्नागिरी - आपले सरकार राज्यात आले आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. कोकणवासियांना गावापर्यंत पोहचण्यास कुठलेही विघ्ने आली नाही. एकनाथ शिंदे यांनी चोख काम बजावलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत अनेक चांगले निर्णय घेतले. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला. पोलिसांना १५ लाखांत घरे जे दिवसरात्र लोकांसाठी काम करतात हा निर्णय जे मागच्या काळात उद्धव ठाकरे, अजित पवारांना जमलं नाही ते या सरकारनं केले अशा शब्दात माजी मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केले आहे. 

रामदास कदम म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरचं काम प्रगतीपथावर आणलं. एकनाथ शिंदे यांच्या मुलाने ४०० एसटी बसेस कोकणवासियांसाठी मोफत सोडल्या. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी असं करणे हे पहिल्यांदाच घडलं आहे. स्वत:साठी जगला तो मेला, दुसऱ्यासाठी जगला तो जगला असं काम एकनाथ शिंदे यांचे सुरू आहे. चांगले निर्णय घेतायेत. दिवसरात्र काम करतात. मंत्रालयात भेटतात. याआधीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ ३ वेळा मंत्रालयात आले होते असा टोला कदमांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

तसेच मुख्यमंत्री कसा असावा हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही अनुभवी नेते आहेत. एक से भले दो...दोघं एकत्र येत महाराष्ट्राच्या विकासाचा गाढा पुढे नेतायेत. हा मुख्यमंत्री आमचा आहे अशी भावना लोकांच्या मनात आहे. मी कोकणवासियांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो असंही रामदास कदमांनी सांगितले. 

याआधीही रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर साधला होता निशाणाकदमांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. कदम म्हणाले होते की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

२०१९ मध्ये आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष केला. हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती करू नका. ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल अशी आपल्याला विनंती केली. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी शिवसेना नेता या पदाचा राजीनामा देत आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदम