शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार?; NCP नेते एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितली कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 09:28 IST

सरकार ज्यावेळेस बहुमतात असते तेव्हा निर्णय घेतले जातात ते वैध असतात. परंतु काही संकेत, नियम आपण पाळायचे असतात असं एकनाथ खडसेंनी म्हटलं.

बुलढाणा - सरकार केव्हा कोसळेल हे सांगता येणार नाही. सध्या अधांतरी आहे. अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते यावर सर्व अवलंबून आहे. सरकारची निश्चिचता, अनिश्चितता कोर्टाच्या निर्णयावर आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमदारांमध्ये असंतोष पसरला तर सरकारला त्यावेळीही धोका पोहचू शकतो. प्रत्येकाला अपेक्षा आहे त्यामुळे प्रत्येकाला संधी देणे अवघड आहे. त्यामुळे सरकार कोसळण्यासाठी बरीच कारणे आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. 

एकनाथ खडसे(Eknath Khadse) म्हणाले की, सरकार ज्यावेळेस बहुमतात असते तेव्हा निर्णय घेतले जातात ते वैध असतात. परंतु काही संकेत, नियम आपण पाळायचे असतात. अलीकडे सरकारमध्ये येणारे संकेत पायदळी ठेऊनच निर्णय घेतो असं चित्र आहे. पण जे सरकार बहुमत असतं त्याचे निर्णय हे कायद्याने मान्यच असतात. काँग्रेस-राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी भक्कम आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार उभा केला जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे दोघांच्या चूका झाल्यातसेच स्व. बाळासाहेब ठाकरेंनी उभ्या आयुष्यात धनुष्यबाणासाठी जी पुण्याई खर्ची केली. धनुष्यबाणानं त्यांनी अनेक निवडणुका जिंकल्या. सत्तास्थाने प्राप्त केली. परंतु दोघांच्या भांडणात धनुष्यबाणही मोडलं, शिवसेना नावही गेले. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना असं नावं आली. पुढच्या काळात या दोघांपैकी कुणाला यश येईल, अपयश येईल हा भाग वेगळा आहे. मात्र परंपरागत पिढीजात पुर्वजांनी कमावलेले नाव आणि चिन्ह दोघांनीही गमावलं आहे असं खडसे म्हणाले.  

त्याचसोबत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे पक्षप्रमुख होते. एखाद्या पक्षाचा प्रमुख १०० टक्के निर्भिडपणे काम करेलच असं नसतं. मग तो कुणत्याही पक्षाचा असो. कधी ना कधी चूक होऊ शकते. ती चूक दुरुस्तही होऊ शकते. उद्धव ठाकरेंकडूनही चुका झाल्या असतील परंतु इतक्या मोठ्या चुका नाहीत ज्यामुळे पक्ष मोडीत निघेल. आपल्याच घरात आग लावण्याचा हा प्रकार आहे. दोघांच्या हातातून चूका घडल्या आहेत. टोकाची भूमिका घेतली गेली. त्यामुळे आज धनुष्यबाण चिन्ह हे तात्पुरतं का होईना पण नामशेष झाल्याचं चित्र आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना