शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

जीवाचं बरं-वाईट झाल्यास जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारची, सुरक्षा काढल्यानंतर मिटकरींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 08:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना नागपूर विभागाकडून एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना नागपूर विभागाकडून एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु त्यांची सुरक्षा काढण्यात आल्याचं त्यांना फोनद्वारे सांगण्यात आल्याची माहिती मिटकरी यांनी दिली. नागपूर विभागाच्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटनं फोन करून सुरक्षा काढण्यात आल्याचं सांगितलं असंही ते म्हणाले.

“गेल्या काही महिन्यांपूर्वी मला काही गोष्टी संशयास्पद आढळल्या. त्यानंतर मी रितसर अर्ज केला आणि वळसे-पाटील गृहमंत्री असताना गृहविभागाने त्यावर तात्काळ अंमलबजावणी करत मला तात्काळ एक्स दर्जाची सुरक्षा दिली. ही सुविधा नागपूर विभागाकडून पुरवण्यात आली होती. मात्र देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले आणि शिंदे सरकार सत्तेत आलं त्यानंतर अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याची माहिती समोर आली,” असं मिटकरी म्हणाले. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

“आम्ही लोकांमध्ये फिरणारे आहोत. आम्हाला कधीही सुरक्षेची गरज वाटली नाही आणि आताही ती नाही. महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम आहे. पण नागपूर विभागातील स्पेशल डिपार्टमेंट आहे तिथून फोन आला आणि सुरक्षा काढण्यात आल्याचं सांगितलं. तेथील एपीआयना फोन करून विचारलं आणि एटीएसकडून तसं पत्र आलं असेल तर ते दाखवा असं त्यांना सांगितलं. त्यांनी ते दाखवण्यास नकार दिला,” असंही ते म्हणाले.

राजकारण कशाप्रकारे सुरू आहे, शिंदे गटाच्या आमदारांना एक्स प्लस, व्हाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, रवी राणांना विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यांना का सुरक्षा पुरवली गेली आणि आमची सुरक्षा का काढली गेली याची गृहविभागानं एकदा माहिती द्यावी. सुरूवातीपासून मी एका प्रवृत्तीविरुद्ध लढणारा माणूस आहे. या देशाला ज्या जात्यांध प्रवृत्तीनं सामाजिक सलोखा बिघडवला, त्यांच्याविरोधात आम्ही बोलत आहोत. जर आमच्या जीवाला काही धोका झाला, तर यासाठी शिंदे सरकार जबाबदार राहिल. त्यांनी याची जबाबदारी घ्यावी. जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला शिंदे फडणवीस सरकार जबाबदार असेल, असंही मिटकरी म्हणाले.

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र