शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

उद्धव ठाकरेंमध्ये 'जासूस करमचंद' अवतरलाय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 12:41 IST

अडीच वर्षात २ वेळा मंत्रालयात गेलेले फावल्या वेळात सीआयडी आणि क्राईम पेट्रोल पाहत असतील असं एकनाथ शिंदे म्हणाले.

पालघर - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. घडलेली घटना वेदनादायी आहे परंतु त्यावरून राजकारण करणे हे अतिशय वाईट आहे. फावल्या वेळेत क्राईम पेट्रोल, सीआयडी बघितल्याने उद्धव ठाकरे यांच्यात जासूस करमचंद अवतरला असावा असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. तरूण होतकरू मुलाचा मृत्यू झाला. झालेला प्रकार दुर्दैवी तसेच त्याचे राजकारण करणेही दुर्दैवी आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती त्यांनी अशाप्रकारे विधाने करणे. फेसबुक लाईव्ह झालंय, पोलीस तपास करतायेत. सत्य बाहेर येणार आहे. कुणालाही पाठिशी घालण्याचं काम होणार नाही. आमचे गृहमंत्री आणि गृह खाते सक्षम आहे. या घटनेवर गृहमंत्री आणि मीदेखील बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशाप्रकारच्या घटनेचं राजकारण करणे अतिशय वाईट आहे. अडीच वर्षात २ वेळा मंत्रालयात गेलेले फावल्या वेळात सीआयडी आणि क्राईम पेट्रोल पाहत असतील. त्यातील जासूस करमचंद त्यांच्यात आवतरला असेल. ही घटना दुर्दैवी आहे, वाईट आहे परंतु राजकारण करायला आपल्या सहकाऱ्याला मुलाचा मृत्यू आणि त्यातून राजकारण करणे हे फार वाईट आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राज्यात कायद्याचे राज्य आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. कुठल्याही गुन्हेगाराला पाठिशी घातले जाणार नाही. सूड भावनेने आकसाने कुठलेही काम करणार नाही. जे पूर्वी केले आहे त्याचीही माहिती आपल्याला आहे. पत्रकारांना जेलमध्ये टाकलं. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं, कंगना रानौतचं घर पाडलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून अटक केली. साधूचे हत्याकांड झाले. या सगळ्या घटना घडल्या आहेत. ज्या घटना आता घडल्यात त्याचे समर्थन सरकार करणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. जे आरोप करतायेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. विकासाची जी कामे होतायेत त्यातून ही पोटदुखी आहे. जनता सुज्ञ असून येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. "अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मात्र ज्याने हत्या केली त्यानेही नंतर आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं दिसतंय तेवढं सोपं दिसत नाही आहे. सूड भावनेतून माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. त्याने टोकाचं पाऊल उचललं असेल तर त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न राहतो अशी शंका उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत सरकारवर टीका केली होती.

टॅग्स :Abhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकरEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे