शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

उद्धव ठाकरेंमध्ये 'जासूस करमचंद' अवतरलाय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 12:41 IST

अडीच वर्षात २ वेळा मंत्रालयात गेलेले फावल्या वेळात सीआयडी आणि क्राईम पेट्रोल पाहत असतील असं एकनाथ शिंदे म्हणाले.

पालघर - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. घडलेली घटना वेदनादायी आहे परंतु त्यावरून राजकारण करणे हे अतिशय वाईट आहे. फावल्या वेळेत क्राईम पेट्रोल, सीआयडी बघितल्याने उद्धव ठाकरे यांच्यात जासूस करमचंद अवतरला असावा असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. तरूण होतकरू मुलाचा मृत्यू झाला. झालेला प्रकार दुर्दैवी तसेच त्याचे राजकारण करणेही दुर्दैवी आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती त्यांनी अशाप्रकारे विधाने करणे. फेसबुक लाईव्ह झालंय, पोलीस तपास करतायेत. सत्य बाहेर येणार आहे. कुणालाही पाठिशी घालण्याचं काम होणार नाही. आमचे गृहमंत्री आणि गृह खाते सक्षम आहे. या घटनेवर गृहमंत्री आणि मीदेखील बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशाप्रकारच्या घटनेचं राजकारण करणे अतिशय वाईट आहे. अडीच वर्षात २ वेळा मंत्रालयात गेलेले फावल्या वेळात सीआयडी आणि क्राईम पेट्रोल पाहत असतील. त्यातील जासूस करमचंद त्यांच्यात आवतरला असेल. ही घटना दुर्दैवी आहे, वाईट आहे परंतु राजकारण करायला आपल्या सहकाऱ्याला मुलाचा मृत्यू आणि त्यातून राजकारण करणे हे फार वाईट आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राज्यात कायद्याचे राज्य आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. कुठल्याही गुन्हेगाराला पाठिशी घातले जाणार नाही. सूड भावनेने आकसाने कुठलेही काम करणार नाही. जे पूर्वी केले आहे त्याचीही माहिती आपल्याला आहे. पत्रकारांना जेलमध्ये टाकलं. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं, कंगना रानौतचं घर पाडलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून अटक केली. साधूचे हत्याकांड झाले. या सगळ्या घटना घडल्या आहेत. ज्या घटना आता घडल्यात त्याचे समर्थन सरकार करणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. जे आरोप करतायेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. विकासाची जी कामे होतायेत त्यातून ही पोटदुखी आहे. जनता सुज्ञ असून येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. "अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मात्र ज्याने हत्या केली त्यानेही नंतर आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं दिसतंय तेवढं सोपं दिसत नाही आहे. सूड भावनेतून माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. त्याने टोकाचं पाऊल उचललं असेल तर त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न राहतो अशी शंका उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत सरकारवर टीका केली होती.

टॅग्स :Abhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकरEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे