शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 06:25 IST

उद्धव ठाकरे घर सोडून बाहेर फिरू लागले. तरीही खरी शिवसेना म्हणून जनतेने शिंदेंच्याच पारड्यात आशीर्वाद दिले, असे  संदेशात म्हटले

ब्रँड आणि ब्रँडिंगस्वतःचा ब्रॅण्ड स्वतः तयार करायचा, स्वतःला सामान्य समजणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अग्रगण्य ब्रँड आहेत असे संदेश शिंदेसैनिकांकडून व्हायरल झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी शिंदेंना सत्तेतील ५० आमदार, १२ खासदार येऊन मिळाले. त्यांच्या  मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात न भूतो न भविष्यती असे काम झाले, असा दावा शिंदेसैनिकांनी संदेशात केला. त्यांच्या कार्याचा झपाटा बघून उद्धव ठाकरे घर सोडून बाहेर फिरू लागले. तरीही खरी शिवसेना म्हणून जनतेने शिंदेंच्याच पारड्यात आशीर्वाद दिले, असे  संदेशात म्हटले. ठाकरे ब्रँड मजबूत करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असताना त्यांना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडनेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू केल्याची कुजबुज आहे.

तक्रारींचे असेही मिळते फळएकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नवी मुंबईत अनेक जण शिंदेसेनेच्या दावणीला गेले. निष्ठावंत उद्धवसेनेतच राहिले. गणेश नाईकांची सत्ता असलेली नवी मुंबई पालिका काबीज करण्यासाठी उद्धवसेनेतील जे गळाला लागले नाहीत त्यांच्याविराेधात जे गळाला लागले त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मातोश्रीवर तक्रारी केल्या. आधीच याची कुणकुण लागल्याने ज्यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला त्याच विठ्ठल मोरे, एम. के. मढवीसारख्या नेत्यांना मातोश्रीने   उपनेतेसारखी पदे दिली. यामुळे तक्रारी असूनही ज्यांच्याकडून फायदा आहे, त्यांना कामाचे असेही फळ मिळते, अशी चर्चा  आहे.

घरातच बुरूज ढासळतोयरायगड जिल्हा आणि शेकाप हे एक समीकरण म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखले जात होते. मात्र, रायगड जिल्ह्यातून शेकापचे अतित्वच नष्ट होण्याची वेळ पक्षावर आली आहे. जिल्ह्यात सातपैकी एकाही मतदारसंघात शेकापचा आमदार नाही. त्यातच पक्षातील एकामागून एक नेते पक्षाला सोडून जात आहेत. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पंडित पाटील यांनी पक्षनेतृत्वात टीका केली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अर्थात घरातच शेकापचा बुरूज ढासळत चालल्याची कुजबुज रायगड जिल्ह्यात सुरू आहे. 

ठाणेकरांचे जिंकले मनविरोधकांना आपलेसे करण्याचे कसब खा. नरेश म्हस्के यांच्याकडे आहे. बोरीवली टनेलच्या बैठकीवेळी म्हस्के यांनी नागरिकांना अपेक्षित असलेला मुद्दा डावलून दुसऱ्या मुद्याला हात घालताच नागरिक संतप्त झाले होते. परंतु, काही क्षणातच जे नागरिक संतप्त झाले होते त्याच नागरिकांनी म्हस्के यांच्या बाजूने टाळ्या वाजवल्या. मी तुमच्यातलाच आहे, मी परका नाही, इतर सर्वजण साथ सोडून जातील, किंबहुना सोडून गेले आहेत. तुमची समस्या सोडविण्यासाठी येथे आल्याचे त्यांनी सांगितले. समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रयत्न असणार आहे, असे सांगत त्यांनी नागरिकांवर  भुरळच पाडली. ठाणेकरांचे मन जिंकण्याचे म्हस्के यांचे कसब  पाहण्यास मिळाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे