शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 06:25 IST

उद्धव ठाकरे घर सोडून बाहेर फिरू लागले. तरीही खरी शिवसेना म्हणून जनतेने शिंदेंच्याच पारड्यात आशीर्वाद दिले, असे  संदेशात म्हटले

ब्रँड आणि ब्रँडिंगस्वतःचा ब्रॅण्ड स्वतः तयार करायचा, स्वतःला सामान्य समजणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अग्रगण्य ब्रँड आहेत असे संदेश शिंदेसैनिकांकडून व्हायरल झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी शिंदेंना सत्तेतील ५० आमदार, १२ खासदार येऊन मिळाले. त्यांच्या  मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात न भूतो न भविष्यती असे काम झाले, असा दावा शिंदेसैनिकांनी संदेशात केला. त्यांच्या कार्याचा झपाटा बघून उद्धव ठाकरे घर सोडून बाहेर फिरू लागले. तरीही खरी शिवसेना म्हणून जनतेने शिंदेंच्याच पारड्यात आशीर्वाद दिले, असे  संदेशात म्हटले. ठाकरे ब्रँड मजबूत करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असताना त्यांना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडनेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू केल्याची कुजबुज आहे.

तक्रारींचे असेही मिळते फळएकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नवी मुंबईत अनेक जण शिंदेसेनेच्या दावणीला गेले. निष्ठावंत उद्धवसेनेतच राहिले. गणेश नाईकांची सत्ता असलेली नवी मुंबई पालिका काबीज करण्यासाठी उद्धवसेनेतील जे गळाला लागले नाहीत त्यांच्याविराेधात जे गळाला लागले त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मातोश्रीवर तक्रारी केल्या. आधीच याची कुणकुण लागल्याने ज्यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला त्याच विठ्ठल मोरे, एम. के. मढवीसारख्या नेत्यांना मातोश्रीने   उपनेतेसारखी पदे दिली. यामुळे तक्रारी असूनही ज्यांच्याकडून फायदा आहे, त्यांना कामाचे असेही फळ मिळते, अशी चर्चा  आहे.

घरातच बुरूज ढासळतोयरायगड जिल्हा आणि शेकाप हे एक समीकरण म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखले जात होते. मात्र, रायगड जिल्ह्यातून शेकापचे अतित्वच नष्ट होण्याची वेळ पक्षावर आली आहे. जिल्ह्यात सातपैकी एकाही मतदारसंघात शेकापचा आमदार नाही. त्यातच पक्षातील एकामागून एक नेते पक्षाला सोडून जात आहेत. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पंडित पाटील यांनी पक्षनेतृत्वात टीका केली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अर्थात घरातच शेकापचा बुरूज ढासळत चालल्याची कुजबुज रायगड जिल्ह्यात सुरू आहे. 

ठाणेकरांचे जिंकले मनविरोधकांना आपलेसे करण्याचे कसब खा. नरेश म्हस्के यांच्याकडे आहे. बोरीवली टनेलच्या बैठकीवेळी म्हस्के यांनी नागरिकांना अपेक्षित असलेला मुद्दा डावलून दुसऱ्या मुद्याला हात घालताच नागरिक संतप्त झाले होते. परंतु, काही क्षणातच जे नागरिक संतप्त झाले होते त्याच नागरिकांनी म्हस्के यांच्या बाजूने टाळ्या वाजवल्या. मी तुमच्यातलाच आहे, मी परका नाही, इतर सर्वजण साथ सोडून जातील, किंबहुना सोडून गेले आहेत. तुमची समस्या सोडविण्यासाठी येथे आल्याचे त्यांनी सांगितले. समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रयत्न असणार आहे, असे सांगत त्यांनी नागरिकांवर  भुरळच पाडली. ठाणेकरांचे मन जिंकण्याचे म्हस्के यांचे कसब  पाहण्यास मिळाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे